शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
6
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
7
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
8
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
9
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
10
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
11
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
12
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
13
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
14
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
15
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
16
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
18
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
19
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
20
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

सफाळ्याचे वाढीव बेट काळोखात

By admin | Updated: July 14, 2014 01:36 IST

सफाळे-वैतरणा स्टेशनच्या दरम्यान उत्तर वैतरणा खाडीच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटावरील सुमारे दोन हजार नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणी इ. सोयीसुविधा मिळविण्यासाठी दररोज जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे

पालघर : सफाळे-वैतरणा स्टेशनच्या दरम्यान उत्तर वैतरणा खाडीच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटावरील सुमारे दोन हजार नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणी इ. सोयीसुविधा मिळविण्यासाठी दररोज जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. यातच मागील तीन दिवसांपासून या बेटावरील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव काळोखात बुडाले आहे. विद्युत वितरण सफाळे कार्यालयाला अनेक वेळा कळवूनही या गंभीर घटनेची दखल घेण्याची सवड त्यांना नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.पालघर तालुक्यातील सफाळे व वैतरणा स्टेशनच्या दरम्यान वाहणाऱ्या वैतरणा खाडीमध्ये वाढीव बेट वसले आहे. वाढीव वैतीपाड्यातील ३०८ घरांमधून २ हजार २०० लोक इथे राहतात. शेती व रेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावाची सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची असून जि. प. च्या १७ गावे करवाळे पाणी पुरवठा योजनेतून या गावाला पाणी पुरवठा केला जातो, मात्र पाण्याची लाईन रेल्वेच्या हादऱ्याने सतत नादुरूस्त होत असल्याने महिलांना डोक्यावर हंडे घेऊन रेल्वे ट्रॅकमधून जीवघेणा प्रवास करीत पाणी आणावे लागते. यावेळी अनेक महिलांना अपघात होऊन त्यांचा मृत्यू ओढवल्याचेही पुढे आले आहे, तसेच आठवडा - पंधरवड्यातून एकदाच वैद्यकीय अधिकारी गावात येत असल्याने एखादा रूग्ण आजारी पडल्यास त्याला बोटीतून अथवा डोलीद्वारे सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा खाजगी रूग्णालयात न्यावे लागत असल्याचे प्रफु ल्ल भोईर यांनी सांगितले.जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या या वाढीव गावाला आजपर्यंत समस्येव्यतिरिक्त काहीही पदरी पडलेले नाही. मागच्या शुक्रवारपासून या गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी सफाळे कार्यालयाकडे अनेक वेळा कळविले असल्याचे प्रफुल्ल भोईर यांनी सांगितले. या गावात १ ली ते ७ वी इयत्तेत ८२ विद्यार्थी शिक्षण घेत असून ८ वी ते १० वीच्या शिक्षणासह महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी १५० च्या आसपास विद्यार्थ्यांना पहाटे उठून वैतरणा, पालघर, विरार या भागातील शाळा कॉलेजमध्ये जावे लागते. व्यवसायानिमित्ताने रेल्वे पकडण्यासाठी वैतरणा स्टेशनला जाणारा कामगारवर्गही मोठा असून विषारी साप, विंचू यांचा मोठा वावर या भागात असल्याने जीव मुठीत धरून विद्यार्थी, प्रवाशांना पहाटे प्रवास करावा लागत आहे. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गावात उधाणाचे पाणी घरात शिरुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. (वार्ताहर)