शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

चौकशीत अग्निशमन विभागाचे पितळ उघडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 00:52 IST

पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते आणि त्यांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीच आता हे ‘ऑडिट’ करण्याचे काम करावे, अशीही अपेक्षा वसई-विरारकर करीत आहेत.

आशिष राणे

वसई : विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाअंतर्गत गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या चौकशीत महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे आता वसई - विरार मनपाच्या अग्निशमन विभागाचेच ‘ऑडिट’ करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते आणि त्यांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीच आता हे ‘ऑडिट’ करण्याचे काम करावे, अशीही अपेक्षा वसई-विरारकर करीत आहेत. विजय वल्लभ रुग्णालय आगीच्या दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीत अग्निशमन विभागाचा रामभरोसे कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गंभीर म्हणजे अग्निशमन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची सपशेल पायमल्ली केली असून, कोविड रुग्णालयांना कसलीही शहानिशा न करताच वातानुकूलित कक्षात बसवून नाहरकत दाखले देण्यात आल्याची धक्कादायक माहिती विजय वल्लभ रुग्णालयाच्या आगीच्या घटनेमुळे समोर आली  आहे.

दरम्यान, दिनांक २३ एप्रिलला शुक्रवारी विरारच्या विजय वल्लभ या खासगी कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून १५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रुग्णालय व्यवस्थापनावर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. आता या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी मीरा - भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या चौकशीमध्ये पालिकेच्या अग्निशमन विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालिकेने अग्निसुरक्षेच्या किती नोटीस पाठवल्या?

nआग दुर्घटनेसाठी कोण जबाबदार आहे, ते गुन्हे शाखेतर्फे निश्‍चित केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये निर्णय देताना दरमहा सर्व कोविड रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, वसई - विरार शहर महापलिकेचा अग्निशमन विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एखाद्या कायद्याप्रमाणे असतो. nपालिकेला अशा आदेशाबद्दल काहीच माहिती नसल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेने शहरातील किती आस्थापनांना अग्निसुरक्षेच्या नोटीस पाठवल्या? रुग्णालय आणि इतर आस्थापनांनी अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केले नसेल तर अग्निशमन विभागाने त्यांच्यावर कारवाई का केली नाही? याचीही चौकशी तपासात पालिकेकडे केली जाणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर