शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

निर्जन वा अंधार असलेल्या २७७ ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांसह सीसीटीव्ही, वीज दिवे बसवण्याच्या  महापालिकांना सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 15:16 IST

शहरातील निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी महिला - मुलींच्या सुरक्षिततेचा आढावा घेत पोलिसांनी मीरा भाईंदर शहरात अश्या १९६ तर वसई विरार शहरात ८१ ठिकाणांची यादी बनवली आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तांनी महिला सुरक्षितता समितीच्या बैठकीत मीरा भाईंदर व वसई व्रत महापालिकांना महिला सुरक्षिततेसाठी २७७ निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे , सीसीटीव्ही व वीज दिवे बसवण्याच्या सूचना केल्या आहेत . मीरा भाईंदर महापालिकेने वीज दिवे बसवण्याची तयारी दर्शवली असली तरी सुरक्षा रक्षक नेमण्यास व सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतलेला नाही . 

शहरातील निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी महिला - मुलींच्या सुरक्षिततेचा आढावा घेत पोलिसांनी मीरा भाईंदर शहरात अश्या १९६ तर वसई विरार शहरात ८१ ठिकाणांची यादी बनवली आहे .  निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी  महिला - मुलीं सोबत गैरप्रकार होण्याची भीती असते . शिवाय गर्दुल्ले - मद्यपी, व्यसनी आदी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांचा वाढता वावर महिला - मुलींच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचा ठरू शकतो . उनाडटप्पू व रोडरोमियोंचा धोका असतो . 

महिला सुरक्षितता समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी महिला सुरक्षेचा आढावा घेतला . बैठकीत निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे , सीसीटीव्ही व वीजदिवे महापालिकांना बसवण्याच्या सूचना पांडेय यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे आणि वसई विरार महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांना केल्या .   वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस मध्ये सीसीटीव्ही बसवण्यास पोलिसांनी सांगितले आहे . 

सुमारे ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास पालिकांना सांगितले असून मीरा भाईंदर महापालिकेने पोलिस आयुक्तांच्या निर्देशा नुसार पोलिसांनी दिलेल्या ठिकाणी वीजदिवे बसवण्याची कार्यवाही सुरु केल्याचे डॉ . पानपट्टे यांनी सांगितले . सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून सीसीटीव्ही साठी पालिके कडे निधी नसल्याने आमदारांच्या मदतीने शासना कडून निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न पोलीस व पालिका करणार असल्याचे डॉ . पानपट्टे यांनी सांगितले . 

वसई विरार महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले कि , महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निर्देशक नुसार आम्ही महावितरण ला पोलिसांनी दिलेल्या ठिकाणांवर वीजदिवे बसवण्यास कळवले आहे .  समुद्र किनारे किल्ले तसेच अन्य निर्जन ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची कार्यवाही सुरु आहे . शहरात सीसीटीव्ही बसवले जात असल्याचे मुठे म्हणाले .