शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
3
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
4
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
5
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
6
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
7
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
8
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
9
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
11
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
12
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
13
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
15
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
16
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
17
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
18
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
19
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
20
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  

आयुक्तांऐवजी महानगरपालिकेला मिळाले सहायक आयुक्त, उपायुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:30 IST

वसई-विरार महापालिका : कामकाजाचा होतो आहे खेळखंडोबा

आशिष राणे वसई : वसई-विरार महापालिकेची स्थापना होऊन तब्बल दहा वर्षे लोटली तरी शासनाकडून या कोट्यवधींचे बजेट असणाऱ्या महापालिकेला सनदी अधिकारी किंवा कार्यक्षम अधिकारी मिळत नसल्याने त्याचा सर्वाधिक ताण वसई-विरार महापालिकेच्या एकूणच कामकाजावर पडत आहे.

दोन महिन्यांपूर्वी पालिकेचे तत्कालीन आयुक्त बी.जी. पवार सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागेवर आजमितीपर्यंत कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नसतानाच पालिकेत कार्यरत एकमेव उपायुक्तांचीही बदली झाल्याने पालिकेच्या कामकाजाचा बºयापैकी खेळखंडोबा झाला आहे. अखेर राज्य शासनाने महापालिकेत मंत्रालयातून एक सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त दर्जाचा एक अशा दोघा अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती नगर सचिव संजू पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.मनपात प्रत्यक्षात १५ उपायुक्त आणि ३० सहाय्यक आयुक्तांची गरज असताना मात्र राज्य शासनाने केवळ दोनच नियुक्त्या करून या समस्येकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. २००९ मध्ये महापालिकेची स्थापना झाली असून आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या पालघर जिल्ह्यातील शहरी भागातील ही एकमेव महापालिका आहे. या अडीच हजार कोटी बजेट असलेल्या महापालिकेकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तर पालिकेच्या स्थापनेनंतर अधिकारी वर्गाची आवश्यकता असताना शासनाने या पालिकेला दहा वर्षात सदर अधिकाºयांची नेमणूक केली नाही.आता तर दोन महिन्यांपासून पालिकेचा कारभार प्रभारी आयुक्त म्हणून पालघर जिल्हाधिकारी म्हणून डॉ. कै लास शिंदे हे सांभाळत असून त्यांना दोन अतिरिक्त आयुक्त सोबत मदत करणार आहेत. महापालिकेत डॉ. किशोर गवस हे एकमेव उपायुक्त म्हणून कार्यरत होते. परंतु आता मागील महिन्यात त्यांचीही बदली मंत्रालयात झाली असल्याने पालिकेत कालपर्यंत उपायुक्त कार्यरत नव्हते. मात्र राज्य शासनाने बहुतांशी महापालिकेच्या जागा भरून त्या-त्या ठिकाणी सनदी अधिकारी, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त अशा नानाविध जागा भरल्या. मात्र वसई-विरारला आयुक्त न देता केवळ महापालिकेत शंकर खंडारे यांची उपायुक्त व प्रताप कोळी यांची सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.मनपाला हवेत ३० सहा.आयुक्त, १५ उपायुक्तखरे तर महापालिकेला सहाय्यक आयुक्त म्हणून ३० जण हवे असताना शासनाने मात्र एकाचीच नेमणूक केली आहे, तर उपायुक्त म्हणून १५ अधिकारी हवे असताना फक्त एकच जण दिला आहे. त्यामुळे आता शासन मुख्य महापालिका आयुक्त कधी देते याकडे साºयांचे लक्ष लागून राहिले आहे.मे अखेर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागणार असल्याने पालिकांच्या आयुक्तांची जागा मात्र रिक्त असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या दैनंदिन कार्यक्र मावर होत आहे. त्यातच सध्या पालिकेचे कामकाज हे प्रभारी सहाय्यक आयुक्तांच्या जोरावर सुरु असून त्याचा फटका पालिकेला बसत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार