शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

बेपर्वाईला लगाम नसल्यानेच निष्पापांचे जाताहेत बळी, चार दशकांत शेकडोंनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 23:51 IST

तारापूर एमआयडीसीमध्ये आग, स्फोट आणि विषारी वायू गळतीबरोबरच इतर अनेक वेगवेगळ्या झालेल्या अपघातांमध्ये मागील चार दशकांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू तर अनेकांना अपंगत्व आले आहे.

- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये आग, स्फोट आणि विषारी वायू गळतीबरोबरच इतर अनेक वेगवेगळ्या झालेल्या अपघातांमध्ये मागील चार दशकांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू तर अनेकांना अपंगत्व आले असूनही आतापर्यंत दोषी व जबाबदार असणाऱ्यांवर कठोर व ठोस कारवाई होत नसल्यानेच तारापूरमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. या ठिकाणच्या बेपर्वाईला कुणाचाच लगाम नसल्याने निष्पापांचे बळी जात आहेत.औद्योगिक क्षेत्रात अपघात झाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, कामगार विभाग, पोलीस इत्यादी सर्व विभागांचे अधिकारी चौकशी व तपासणी सुरू करतात, तर मंत्रीगण, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व पुढारी घटनास्थळी भेट देऊन जखमींची रुग्णालयांत जाऊन विचारपूस आणि मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करतात, तर मंत्रीगण पत्रकार परिषद घेऊन घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देऊन निघून जातात.मंत्रीगण, पुढारी त्यानंतर पुन्हा नव्याने अपघात झाल्यावरच परततात. पुन्हा मागीलप्रमाणे आश्वासने देतात. परंतु दुर्दैवाचा भाग म्हणजे दुर्घटनेनंतर संबंधित विभाग चौकशी व तपासणी करून जो प्राथमिक अहवाल पोलिसांना देतात, त्या अहवालाच्या आधारावर पोलीस गुन्हा दाखल करून पुढे सदर केस न्यायालयात पाठविल्यानंतर तारीख पे तारीख सुरू होते. मात्र त्याचे पुढे काय होते, ते समोरच येत नाही. दुसरीकडे दुर्घटनेत मृत्यू, जखमी किंवा कायमचे अपंगत्व आलेल्यांना नुकसानभरपाई पुरेसी दिली जात नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबाला मोठे व कायमस्वरूपी आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. आजपर्यंत तारापूरमधील कुठल्याही उद्योजकांवर मोठ्या शिक्षेची कारवाई झाल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही. तर दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी अनेक जण वृत्तपत्रांच्या माध्यमातून करून प्रसिद्धी मिळवतात, परंतु तेही पुढे पाठपुरावा करीत नसल्याने दोषी उद्योजकांवर पर्यायाने व्यवस्थापनावर वचक राहिला नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र भीषण आग, स्फोट किंवा विषारी वायू गळतीसारख्या दुर्घटना घडतात, तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्यांना पोलिसांची मदत मिळते. हे दोन्ही विभाग तत्परतेने काम करताना दिसतात.उत्पादन खर्च कमी करण्याच्यानादात सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्षतारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक रासायनिक कारखान्यांबरोबरच स्टील, टेक्स्टाईल, औषधांच्या निर्मितीकरिता लागणारा कच्चामाल, कीटकनाशक असे सुमारे बाराशे लहान-मोठे उद्योग आहेत. तर रासायनिक प्रक्रि या करताना अत्यंत विषारी आणि ज्वालाग्रही रसायनांचा वापर केला जातो. बहुसंख्य कारखान्यांमध्ये बॉयलर आणि रिअ‍ॅक्टर्स कार्यरत आहेत. या दोन्हीमधील तापमान मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढले तर त्याकरिता सेफ्टी वॉलसह अनेक उपकरणे सुस्थितीत असतील तर अपघाताची शक्यताच नसते. परंतु उत्पादन खर्च कमी करण्याच्या नादात सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जाते तसेच विषारी वायू आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणा-या पाइपलाइनच्या दुरु स्ती आणि देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. याचा परिणाम गंभीर दुर्घटनेत होतो. 

टॅग्स :palgharपालघर