शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शाईची बाधा झाल्याने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची बोटे सुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:34 IST

पालघर लोकसभा निवडणूक सोमवारी शांततेत सर्वत्र पार पडली पण मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना शाईची बाधा झाल्याने बोटे सुजल्याचा प्रकार घडला आहे.

नालासोपारा - पालघरलोकसभा निवडणूक सोमवारी शांततेत सर्वत्र पार पडली पण मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना शाईची बाधा झाल्याने बोटे सुजल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे मतदानाकरिता वापरण्यात येणाऱ्या शाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वसईच्या मतदान केंद्रातील महिला कर्मचाऱ्याला शाईची बाधा झाल्याने बोटे सुजल्यावर डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करण्यात आले आहे.

मतदान करण्यासाठी मतदारांच्या डाव्या बोटाला निळीकाळ्या रंगाची शाई लावण्यात येते. ही शाई मतदारांच्या बोटाला लावण्यासाठी एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. पण या शाईची बाधा काही कर्मचाऱ्यांना झाली असल्याची बाब पुढे आली आहे. वसईमधील नाझरेथ शाळेच्या मतदान केंद्रावर मतदारांना शाई लावण्यासाठी दीपाली बागुल या महिला कर्मचारीची नियुक्ती केली होती. त्यांच्या बोटाला ही शाई लागल्याने वेदना होत झोबूं लागल्याने बोटे सुजली. पण मतदान केंद्र सोडता येत नसल्यामुळे मतदान संपल्यावर डॉक्टरांकडे धाव घेतली. ह्या शाईची ऍलर्जी झाल्यामुळे बोटे सुजल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून दीपाली यांना औषधे आणि इंजेक्शन दिले. असाच तक्रारी घेऊन चार ते पाच जण आले असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. 

शाई खराब असल्याची किंवा कोणाची बोटे सुजल्याची एकही तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही तरी पण मी बघतो नेमके काय प्रकार आहे तो - डॉ. दीपक क्षीरसागर (वसई प्रांताधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी, मतदार संघ वसई, 133)

शाई ज्या बाटतील होती ती छोटी आणि निमुळती होती. त्यामुळे त्यातून शाई काढून लावताना हाताला लागत होती. शाईमुळे हाताची बोटे सुजली आणि कमालीची झोंबू लागली होती. शाई निघू नये म्हणून ती अधिक तीव्र रसायनांनी बनवली जात असेल. मात्र त्याचा थेट हाताशी संपर्क येत असल्याने या शाईची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. - दीपाली बागुल (बाधा झालेल्या महिला कर्मचारी)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानpalghar-pcपालघर