शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी दिली सरकारच्या योजनांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:37 IST

आदिवासी विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आज गेल्या तीन वर्षात पालघर जिल्हात शासनामार्फत झालेल्या कामांची माहिती पत्रकारांना दिली.

पालघर: आदिवासी विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आज गेल्या तीन वर्षात पालघर जिल्हात शासनामार्फत झालेल्या कामांची माहिती पत्रकारांना दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गेल्या तीन वर्षात उपलब्ध झालेला निधी व त्याचा झालेला खर्च यासंबंधीची माहिती देण्याबरोबरीने जिल्ह्यातील रस्ते,पूल,जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकास तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळा वसतिगृहाचे बांधकाम ,कुपोषण निर्मूलनाच्या आलेले यश आदी संबंधात पालकमंत्र्यांनी आकडेवारीसह यावेळी माहिती दिली.मात्र गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील महत्वाच्या अशा वारंवार ज्या प्रकल्पाचा उल्लेख होत आहे असे वारली हाट, जिल्हा रु ग्णालय, ट्रामा केयर सेंटर आदी जिल्ह्याच्या महत्वपूर्ण प्रकल्पाबाबत काय प्रगती आहे व हे प्रकल्प केव्हा मार्गी लागतील याबाबतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही.जिल्हा पातळीवरील अनेक कार्यालये आजही सुरु नसल्याचे त्यांनी प्रारंभीच मान्य केले व कार्यालये स्थापित होण्याची प्रक्रि या काहीशी किचकट असल्याने हा विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याच वेळी सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या पालघर येथे सुरु झालेल्या जिल्हा कार्यालयाचे कामकाज आजही ठाण्यातूनच चालतो हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची समर्थनीय करणे देण्यात पालकमंत्री अपयशी ठरले. या कार्यालयाचे कामकाज पालघरमधून चालावे यासाठी संबंधितांना असे अखेरीस पालकमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.पालघर जिल्ह्यामध्ये बुलेट ट्रेन,समिर्पत रेल्वे मालवाहतूक प्रकल्प,विरार-डहाणू चौपदरीकरण आदी रेल्वे प्रकल्पांबरोबरीने मुंबई वडोदरा महामार्ग,वाढवण बंदर व या बनराकडून मुंबई-अहामादाबाद मार्गाकडे जाणार्या रस्ता आदी विविध प्रकल्पात शेतकर्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात वर्षे आदिवासी व शेतककरी याविरोधात आंदोलने करत असून पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता शेतकर्यांशी संवाद साधण्याची शासनाची भूमिका असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळेत गेल्या तीन वर्षात या गंभीर प्रश्नावर अनेकवेळा आंदोलने होऊनही पालकमंत्र्यांनी या बाधित शेतकर्यांशी एकदाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासकीय जमीनी उपलब्ध करु न देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, वसतीगृह इत्यादीचे प्रयोजन आहे. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत उद्योग वाढीसाठी ९,५४,७२२ चौ.मी. क्षेत्रावर ७४ सनद परवानगी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नैसिर्गक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना (७० वारसांना) रु . २ कोटी ५ लाख मदत देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेकरु ंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा दूर्दैवी मृत्यू झाला. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी रु. दहा लाख मदत करण्यात आली. जिल्ह्यातील प्रश्न व समस्या या संवादातून सोडविणार असून सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सवरा यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, सहाय्यक जिल्हाधिकारी आंचल गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी परमीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, उपवनसंरक्षक श्री. लडकत विविध विभागाचे विभाग प्रमुख व पत्रकार उपस्थित होते.