शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाणजुकरांना मिळणार स्वतंत्र पूल

By admin | Updated: February 20, 2017 05:19 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून धोकादायक बोटीवर अवलंबून असणाऱ्या पाणजुकरांना स्वतंत्र पुल मिळणार असल्याच्या आशा पल्लवीत झाल्या

वसई : स्वातंत्र्यपूर्व काळापासून धोकादायक बोटीवर अवलंबून असणाऱ्या पाणजुकरांना स्वतंत्र पुल मिळणार असल्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा पूल एमएमआरडीए बांधणार असून त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भार्इंदर आणि नायगांव या रेल्वे स्थानक आणि खाडीवरील पुलाच्या मध्ये चारही बाजुंनी पाण्याने वेढलेले पाणजु हे गांव आहे. या गावात जाण्यासाठी खाडीपुलावरून कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत जावे लागते.किंवा नायगांवच्या किनाऱ्यावरून बोटीने गाव गाठावे लागते. बोटीच्या या धोकादायक प्रवासात अनेकदा अपघातही घडले आहेत. तसेच रात्री ८ नंतर बोटी बंद होत असल्यामुळे कित्येक ग्रामस्थांना अंधारात रेल्वे पुलावरून मार्गक्रमण करावे लागते.अथवा रात्र फलाटावर काढावी लागत आहे.त्यामुळे पाणजु ते नायगांव असा सागरी पुल तयार करण्यात यावा.अशी मागणी करण्यात येत होती. पावसाळ्यात उधाण आणि मोठाल्या लाटा उसळत असल्याने गावाबाहेर पडणे गावकऱ्यांना अशक्य होऊन बसते. विशेषत: त्याचा त्रास विद्यार्थी, नोकरदार आणि आजारी माणसाला सहन करावा लागत आहे. एमएमआरडीए दोन्ही खाडीवर पूल बांधणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया देखिल सुुरु करण्यात आली आहे. याआधी रेल्वेच्या जुन्या पूलाची दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी त्याचा वापर करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेने पूल जुना झाल्याने धोकादायक आहे. त्यामुळे त्यावरून हल्नया वाहनांसाठी देखिल वाहतूक सुरु करता येणार नाही. असा अहवाल देऊन पूल मोडित काढण्याची शिफारस रेल्वेला केली होती. त्यानंतर रेल्वेने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारून जुना पूल मोडीत काढण्याचे कामही सुुरु केले होते. (प्रतिनिधी)