शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

वाढवण : मुख्यमंत्र्यांनी केली निराशा

By admin | Updated: February 9, 2016 02:22 IST

वाढवणच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे तुम्हाला आणि मच्छीमार बंधूना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे गुळमुळीत

पालघर : वाढवणच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे तुम्हाला आणि मच्छीमार बंधूना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे गुळमुळीत विधान मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे वाढवण बंदर रद्द केल्याची घोषणा बहुदा ते करतील, अशी अपेक्षा असलेल्या पालघर जिल्हावासियांची आज साफ निराशा झाली. तसेच ठाणे जिल्हा बँकेचे विभाजन करून नवी पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापने बाबतही त्यांनी घोषणा न केल्याने या नाराजीत अधिकच भर पडली. हो आम्हाला विकास हवा आहे. तो करतानाही आम्हाला सर्वसामान्यांना भागीदार करून घ्यायचे आहे, असे उद्गार त्यांनी काढून बंदराच्या उभारणीबाबतचे संकेतच दिले.आज पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा-रिपाईयुतीचे उमेदवार अमीत घोडा यांच्या प्रचारसभा आज पालघरमध्ये पार पडली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, अमीत घोडा, खा. चितामण वनगा, खा. अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, खा. अनिल देसाई, खा. कपील पाटील, उपनेते अनंत तरे, आ. निलम गोऱ्हे, आ. पास्कल धनारे, केतन पाटील, जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे इ. मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्याची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणुन सर्व सोयीयुक्त असे सर्वात चांगले मुख्यालय उभारण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचेही त्यांनी सांगितले. पर्ससीन या विनाशकारी मासेमारी पद्धतीमुळे दहा वर्षात मत्स्यबिजे नष्ट होत आहेत. मत्स्य उत्पादन घटत आहे. त्यामुळे पर्ससीन बंदीचा प्रस्ताव काँग्रेसच्या सरकारने दडवून ठेवला होता. आमच्या सरकारने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आणले व परवान्यावर बंदी आणली. सहकारी बर्फ कारखान्याना १२.५० रू. युनीटने मिळणारी विज आम्ही कमी करून ६ रू. नी दिली, आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून टाटाशी करार करून अद्ययावत किचन निर्मिती केली, आश्रमशाळा मधील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २५ हजार विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित शाळामध्ये प्रवेश मिळवून दिला. पालघरमधील समुद्रकिनारे कारखान्यामधील रासायनिक प्रदुषीत पाण्याने प्रदुषीत झाल्याच्या तक्रारी असल्याने रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी निधी देताना स्थानिकांना नोकरी मिळवून देण्यासाठी डोळ्यात तेल घालून पाहणी करू असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. यावेळी पालघरमधील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण अमीत घोडा यांना निवडून द्या असेही आवाहन त्यानी यावेळी केले. आदिवासींसाठी ५० हजार घरेएकही नागरीक घराशिवाय राहु नये यासाठी सर्व दलीत आदिवासींना घरे देण्यासाठी ५० हजार घरांचे उद्दीष्टे ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र ते कधी पूर्ण होईल, ही घरे कोण साकारणार याबद्दल त्यांनी मौन पाळले.तेही लवकरच आत जातील १५ वर्षात महाराष्ट्रात ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी महाराष्ट्राला लुबाडण्यापलीकडे काहीच केले नाही. आता एकेकांच्या संपत्तीचा खुलासा होतोय ते पाहता थक्क करणारी संपत्ती आहे. काही आता जेलमध्ये आहेत काही बाहेर आहेत तेही लवकरच आत जाणार आहेत. पैसा देशाच्या तिजोरीत परत आणू आमचा कुणाबद्दल आकस नाही पण एक निश्चित केलेय ज्यांनी ज्यांनी या देशाला लुटले त्यांच्या तिजोरीतील पैसा जनतेच्या तिजोरीत परत गेलाच पाहिजे असे सांगून त्यांनी कुणाचेही नाव न घेता आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली.