शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण : मुख्यमंत्र्यांनी केली निराशा

By admin | Updated: February 9, 2016 02:22 IST

वाढवणच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे तुम्हाला आणि मच्छीमार बंधूना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे गुळमुळीत

पालघर : वाढवणच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे तुम्हाला आणि मच्छीमार बंधूना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे गुळमुळीत विधान मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे वाढवण बंदर रद्द केल्याची घोषणा बहुदा ते करतील, अशी अपेक्षा असलेल्या पालघर जिल्हावासियांची आज साफ निराशा झाली. तसेच ठाणे जिल्हा बँकेचे विभाजन करून नवी पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापने बाबतही त्यांनी घोषणा न केल्याने या नाराजीत अधिकच भर पडली. हो आम्हाला विकास हवा आहे. तो करतानाही आम्हाला सर्वसामान्यांना भागीदार करून घ्यायचे आहे, असे उद्गार त्यांनी काढून बंदराच्या उभारणीबाबतचे संकेतच दिले.आज पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा-रिपाईयुतीचे उमेदवार अमीत घोडा यांच्या प्रचारसभा आज पालघरमध्ये पार पडली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, अमीत घोडा, खा. चितामण वनगा, खा. अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, खा. अनिल देसाई, खा. कपील पाटील, उपनेते अनंत तरे, आ. निलम गोऱ्हे, आ. पास्कल धनारे, केतन पाटील, जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे इ. मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्याची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणुन सर्व सोयीयुक्त असे सर्वात चांगले मुख्यालय उभारण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचेही त्यांनी सांगितले. पर्ससीन या विनाशकारी मासेमारी पद्धतीमुळे दहा वर्षात मत्स्यबिजे नष्ट होत आहेत. मत्स्य उत्पादन घटत आहे. त्यामुळे पर्ससीन बंदीचा प्रस्ताव काँग्रेसच्या सरकारने दडवून ठेवला होता. आमच्या सरकारने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आणले व परवान्यावर बंदी आणली. सहकारी बर्फ कारखान्याना १२.५० रू. युनीटने मिळणारी विज आम्ही कमी करून ६ रू. नी दिली, आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून टाटाशी करार करून अद्ययावत किचन निर्मिती केली, आश्रमशाळा मधील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २५ हजार विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित शाळामध्ये प्रवेश मिळवून दिला. पालघरमधील समुद्रकिनारे कारखान्यामधील रासायनिक प्रदुषीत पाण्याने प्रदुषीत झाल्याच्या तक्रारी असल्याने रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी निधी देताना स्थानिकांना नोकरी मिळवून देण्यासाठी डोळ्यात तेल घालून पाहणी करू असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. यावेळी पालघरमधील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण अमीत घोडा यांना निवडून द्या असेही आवाहन त्यानी यावेळी केले. आदिवासींसाठी ५० हजार घरेएकही नागरीक घराशिवाय राहु नये यासाठी सर्व दलीत आदिवासींना घरे देण्यासाठी ५० हजार घरांचे उद्दीष्टे ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र ते कधी पूर्ण होईल, ही घरे कोण साकारणार याबद्दल त्यांनी मौन पाळले.तेही लवकरच आत जातील १५ वर्षात महाराष्ट्रात ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी महाराष्ट्राला लुबाडण्यापलीकडे काहीच केले नाही. आता एकेकांच्या संपत्तीचा खुलासा होतोय ते पाहता थक्क करणारी संपत्ती आहे. काही आता जेलमध्ये आहेत काही बाहेर आहेत तेही लवकरच आत जाणार आहेत. पैसा देशाच्या तिजोरीत परत आणू आमचा कुणाबद्दल आकस नाही पण एक निश्चित केलेय ज्यांनी ज्यांनी या देशाला लुटले त्यांच्या तिजोरीतील पैसा जनतेच्या तिजोरीत परत गेलाच पाहिजे असे सांगून त्यांनी कुणाचेही नाव न घेता आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली.