शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

वाढवण, बुलेट ट्रेनविरूद्धची नाराजी भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:52 IST

या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत भाजपला वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, बुलेट ट्रेन, मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवे या विरूध्द जनतेत असलेली प्रचंड नाराजी भाजपला भोवणार आहे.

नंदकुमार टेणी पालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत भाजपला वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, बुलेट ट्रेन, मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवे या विरूध्द जनतेत असलेली प्रचंड नाराजी भाजपला भोवणार आहे. विशेष म्हणजे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी या प्रकल्पांना सतत विरोध केला होता. परंतु भाजपचे उमेदवार असलेल्या राजेंद्र गावितांना तशी भूमिका घेणे पक्षशिस्तीमुळे शक्य होणार नाही. त्यामुळे या नाराजीच्या आव्हानाचा मुकाबला करण्याचे शिवधनुष्य भाजपला पेलून दाखवावे लागणार आहे.बीएआरसी च्या प्रकल्पासाठी सरकारवर भरवसा ठेऊन ज्यांनी जमीनी दिल्या त्यांना अनेक वर्षे झाली तरी अद्याप जमीनीचा मोबदला मिळालेला नाही तसेच त्यांचे बाडापोखरण येथे झालेले पुर्नवसन देखील धड झालेले नाही त्यामुळे हे प्रकल्पग्रस्त न्यायालयात धाव घेते झाले आहे. त्याबाबत न्यायालयाने न्यायमूर्ती अभय ओक यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नाची पहाणी सुरू केलेली आहे. हा अनुभव ताजा असल्याने या जिल्हयातील भूमिपुत्र कोणत्याही सरकारी प्रकल्पाला जमीन देण्यास तयार नाही. गेल्याच आठवडयात बुलेट ट्रेनसाठी जमीनीचा सर्व्हे करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी पळवून लावले होते व त्यांच्या साधनांची मोडतोड केली होती. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनेही या प्रकल्पांना विरोध केलेला आहे. त्यामुळे हा विरोध भाजपासाठी डोकेदुखी ठरणारा आहे.काहीही झाले तरी मी वाढवण बंदर आणि जेट्टी होऊ देणार नाही त्यासाठी सरकारला आधी माझ्या शरीरावरून बुलडोझर न्यावा लागेल अशी गर्जना करणाºया राजेंद्र गावीतांनी कमळाबार्इंची साथ धरून निवडणूकीच्या आखाडयात उडी घेतल्याने आता त्यांच्या त्या गर्जनेचे काय होणार असा प्रश्न जनता विचारते आहे. तर गावीतांना त्याबाबत मौनी बाबा व्हावे लागणार आहे. पक्षशिस्त म्हणून ते त्या प्रकल्पांना विरोध करू शकणार नाहीत. तेच त्यांना अडचणीचे ठरणार आहे.१९९६ मध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी सरकार असतांना त्याने नेहरू सेंटरमध्ये अ‍ॅडव्हांटेज महाराष्टÑ ही गुंतवणूक परिषद घेतली होती. तेंव्हा पंतप्रधानपदी देवेगौडा होते या परिषदेत आॅस्ट्रेलियातील पी अँड ओ या कंपनीशी महाराष्टÑ सरकारने वाढवण येथे महाकाय बंदर उभारणीचा करार केला होता आणि त्याचे इरादापत्र देवेगौडांच्या हस्ते या कंपनीच्या प्रमुखांना देण्यात आले होते. जेव्हा पालघर जिल्हयातील एक लाख भूमिपुत्रांच्या स्वाक्षºयांचे निवेदन शिवसेना प्रमुखांना दिले गेले तेंव्हा त्यांनी या बंदराला विरोध करून तो प्रस्ताव रद्द करण्याचा आदेश जोशी सरकारला दिला होता. त्यामुळे हा संपूर्ण जिल्हा सतत शिवसेनेच्या पाठिशी राहत आलेला आहे.आता पुन्हा हे बंदर साकारण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. त्याबरोबर बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेस हायवे यासाठीही भूमिसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. त्याला फक्त शिवसेनाच विरोध करते आहे. त्याचा राजकीय फायदा तीला होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने याबाबत अद्याप ठाम भूमिका घेतलेली नाही ही बाबही तिला भोवणारी आहे.बुलेट ट्रेनसाठी इंचभरही जमीन देऊ नका बळजबरीने जमीन घेतली तर या रेल्वेचे रूळ उखडून टाका असा आदेश राज ठाकरे यांनी वसईतल्या सभेत मनसैनिकांना दिला त्यानुसार या प्रकल्पाच्या सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाºयांना पळताभुई थोडी करून व त्यांच्या साधनसामुग्रीची मोडतोड करून मनसेने या प्रश्नाला ऐरणीवर आणले आहे. ही बाब सेना वगळता अन्य पक्षांना भोवणारी आहे.वसई-विरार महापालिकेने मालमत्ता कर १०० टक्के वाढवून ग्रामीण भागातील मालमत्तांवर लादण्याचा जो निर्णय घेतला त्याविरूध्द महापालिका क्षेत्रातील जनमत बहुजन विकास आघाडीच्या विरोधात धगधगते आहे. वसई महापालिका क्षेत्रातील शहरबस वाहतूकीच्या प्रश्नी सत्ताधारी बविआने दाखविलेली निष्क्रीयता बविआला भोवणारी आहे. एमएमआरडीएचा विकास आराखडा, नदीजोड प्रकल्प यालाही भूमिपुत्रांचा विरोध असून त्या विरोधातही स्थानिकांत प्रचंड असंतोष आहे या सगळयाचा फटका भाजपाला आणि काँग्रेस व बविआला बसण्याची शक्यता आहे तर त्याचा लाभ शिवसेनेला होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस भाजप आणि बविआ यांना वरील प्रश्नांबाबत आपली ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे व ती मतदारांपुढे त्यांना पटेल अशा पध्दतीने मांडावी लागणार आहे. हे आव्हान ते कसे पेलतात यावरच या निवडणूकीचा निकाल अवलंबुन राहणार आहे.