शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढला धोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 23:49 IST

जिल्ह्यात आजवर १,४०३ रुग्णांचा मृत्यू, वसई-विरारमध्ये सर्वाधिक बळी, रुग्णांसह नातेवाईक त्रस्त

जगदीश भोवडलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्ह्यासाठी विशेषतः ग्रामीण भागासाठी घातक ठरली आहे. पहिल्या लाटेत पालघरच्या ग्रामीण आदिवासी भागात फारसे नुकसान झाले नव्हते, मात्र आता जिल्ह्यातील अनेक गावातही रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १ हजार ४०३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.जिल्ह्यात एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरारमध्ये सुरुवाती-पासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत होते. त्याला कारण म्हणजे हे शहर मुंबई तसेच ठाणे या भागांना जोडलेले असून नोकरी तसेच उद्योग-व्यवसायासाठी मुंबई-ठाण्यात अनेक लोक जात असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. तसेच पालिका हद्दीतील नागरिकांची बेफिकिरीही तेवढीच कारणीभूत ठरली आहे. अन्य भागांपेक्षा वसई-विरार परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळले असून अद्यापही त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वसई-विरार परिसरातील रुग्णांची संख्याही आता ४७ हजार ४३४ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ९९९ झालेली आहे.वसईनंतर पालघर तालुक्यात जास्त रुग्ण आढळले आहेत. तेथील एकूण रुग्णांची संख्या १४ हजार २७ झाली असून १८५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर डहाणूमध्ये ३ हजार ४८३ रुग्ण आढळले असून ४७ जणांचा प्राण गेला आहे. जव्हारमध्ये २ हजार ७१४ रुग्ण आढळलेले असून २८ जण मृत्युमुखी पडले आहेत. वाडा तालुक्यामध्ये २ हजार ३२६ जण बाधित झालेले असून ६० जण मृत्यू पावले आहेत. वसई ग्रामीण परिसरात १ हजार ६३० रुग्ण आढळलेले असून ५० जण दगावले आहेत. मोखाडा तालुक्यात ६१७ रुग्ण आढळलेले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रमगड तालुक्यात ८७१ रुग्ण आढळले असून १३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तलासरी तालुक्यात ६९१ जण बाधित ठरले असून ७ जणांचा मृत्यू झालेला आहे.आरोग्य यंत्रणेवर वाढला ताणपालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके आदिवासीबहुल असून या भागांतही आता मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागल्याने आणि कोविड रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे.

ऑक्सिजनसाठी करावी लागतेय धावपळपालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विक्रमगड, वाडा, बोईसर, वसई-विरारसह अनेक भागात कोविड केअर सेंटर आणि कोविड रुग्णालये निर्माण करण्यात आलेली आहेत. जवळपास सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झालेली असून अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यातच नालासोपारा येथे अलीकडेच ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. यामुळे सध्या रुग्णांच्या नातेवाइकांची ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा पुरवठा समाधानकारक आहे. बोईसर, कुडूस, नालासोपारा भागातून ऑक्सिजन आणला जात असून मागणीनुसार पुरवठा केला जात आहे.- डॉ. राजेंद्र केळकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या