शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

करवाढ मागे घेण्यासाठी वाढता दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:36 IST

ग्रामीण भागातील वाढीव घरपट्टी मागे घेण्यात यावी यासाठी सर्वपक्षीयांचे जबाब दो आंदोलन सुरु असून प्रशासन मात्र आपल्या

शशी करपे वसई : ग्रामीण भागातील वाढीव घरपट्टी मागे घेण्यात यावी यासाठी सर्वपक्षीयांचे जबाब दो आंदोलन सुरु असून प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सर्वपक्षीयांनी आता आयुक्त चलो जाव आंदोलनाची घोषणा केली आहे. तर महापौरांनी यातून मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीयांशी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.वसई विरार महापालिकेने ग्रामीण भागात घरपट्टी वाढीचा निर्णय घेतल्याने घरपट्टीत दुपटीने वाढ झाली आहे. त्याविरोधात जनआंदोलन समितीने सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून जबाब दो आंदोलन सुरु केले आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामीण भागातील वार्डात जाऊ़न चौकसभा घेत आहेत. त्यानंतर स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयासमोर जाऊन जबाब दो चा नारा देत आहेत. यावेळी नगरसेवक लोकांपुढे येऊ़न आपली बाजू मांडत आहेत. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक लॉरेल डायस वगळता सर्वच नगरसेवकांनी घरपट्टी वाढीला विरोध असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पक्षाचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांना लोकांच्या भावना कळवण्यात आल्या आहेत. असे असले तरी महापालिका प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर अद्याप ठाम आहे. गावात मात्र महापालिकेकडून अद्याप नोटीसा आणि जप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होईल या भितीपोटी गोडीगुलाबीने घरपट्टी वसुली करण्याचे धोरण महापालिकेकडून अवलंबवण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने जनआंदोलन समितीने सर्वपक्षीयांच्या मदतीने आयुक्त चलो जाव आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिली. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सचिव दत्ता नर, कॅथॉलिक बँकेचे चेअरमन ओनिल अल्मेडा, माजी नगरसेविका बीना फुर्ट्याडो, जिल्हाध्यक्ष पुष्कराज वर्तक यांनी महापौरांची भेट घेतली.