शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आदिवासी विद्यार्थ्यांचा कोटा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:34 IST

आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झालेल्या पालघर मधील महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फक्त ७ टक्के एवढा अपुरा कोटा ठेवल्याने तो वाढवून

पालघर : आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झालेल्या पालघर मधील महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फक्त ७ टक्के एवढा अपुरा कोटा ठेवल्याने तो वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्र वारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.मुंबई विद्यापीठाने सुधारित परिपत्रकानुसार अनुसूचित जातीसाठी १३ टक्के जागा, अनुसूचित जमाती साठी ७ टक्के राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून जिल्ह्यातील आदिवासी समाजाची लोकसंख्या सुमारे ५४ टक्के आहे. असे असताना केवळ ७ टक्के जागा महाविद्यालयात राखीव ठेवणे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.आदिवासी समाजातील तरु णवर्ग शिक्षणाकडे वळत असून जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज दाखल झाले आहेत. त्यांना लोकसंख्येच्या संख्ये प्रमाणे महाविद्यालयात जागा राखीव असणे आवश्यक असल्याची मागणी संघटनेने केली आहे. जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळाची क्षमता मागील २५ वर्षांपासून वाढविण्यात न आल्याने आश्रमशाळातील व्यवस्था पूर्णपणे बारगळली असून पटसंख्येच्या मानाने वर्ग खोल्या, शिक्षक संख्या, इमारतीची व राहण्याची व्यवस्था एखाद्या तुरु ंगासारखी झाली आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे , गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यासाठी राखीव जागा तिप्पट करून २१ टक्के करण्याची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनात श्रमजीवीचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, विजय जाधव शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.आरक्षणाची टक्केवारी कमी करु नकापालघर जिल्ह्या साठी महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी आदिवशी अनुसूचित जमाती साठी २२ टके आरक्षण होते ते मुबई विद्यापीठाने कमी करून सात टक्के केल्याने पालघर जिल्ह्यातील आदिवासी विध्यार्थीउच्य शिक्षणा पासून वंचित राहणार आहेत.त्यामुळे आरक्षणाची टक्केवारीकमी करू नये अशी मागणी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी शासना कडे केली आहे.पालघर नंदुरबार व धुळे या जिल्ह्यत बहुसंख्य आदिवासी असल्याने महाराष्ट्र शासनाने या जिल्ह्यसाठी अनुसूचित जमाती साठी २२ टक्के आरक्षण ठेवलेले आहे. मात्र, मुबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ च्या प्रवेशासाठी ७ टक्के आरक्षण ठेवल्याचे परिपत्रक महाविद्यालयाना पाठविले आहे. त्यामुळे काही आदिवशी विध्यार्थी प्रवेशाला मुकणार आहेत. आरक्षण कमी करू नये अशी मागणीपिंपळे यांनी केली आहे.पालघर महाविद्यालयाचे प्राचार्य किरण सावे यांच्याशी संपर्क साधला असता ११ वी प्रवेशासाठी आदिवासी, अनुसूचित जमातीसाठी २२ टक्के आरक्षण आहे, मात्र विद्यापीठाने नव्याने काढलेल्या परिपत्रकात ७२ टक्के आरक्षण आहे त्यामुळे काही आदिवासी विद्यार्थी प्रवेशास मुकणार आहेत म्हणून महाविद्यालयाने याविषयी विद्यापीठाकडे मार्गदर्शन मागविले आहे असे सांगण्यात आले.