शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

पालघरचा कोटा वाढवा

By admin | Updated: February 20, 2017 05:26 IST

पालघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून २०३१ सालच्या पाणीपुरवठ्याची अपेक्षित लोकसंख्येचा टप्पा आताच

हितेन नाईक / पालघरपालघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून २०३१ सालच्या पाणीपुरवठ्याची अपेक्षित लोकसंख्येचा टप्पा आताच पार झाला आहे. नजीकच्या मुंबई महानगरातून पालघरकडे सरकणारा लोंढा, जिल्ह्याची निर्मिती आणि त्या अनुषंगाने सिडकोची होणारी निर्मिती ह्यामुळे भविष्यात सर्वाना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पालघर नगरपालिकेवर पडणार आहे. त्यामुळे पालघर व २६ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी नगरपरिषद २०१२ पासून राज्यशासनाच्या जलसंपदा विभागाकडे करीत असून पालकमंत्र्यांनी ह्या बाबी कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.पालघर नगरपरिषदेची स्थापना सन १९९८ साली झाली. त्यात पालघर, टेम्भोडे, अल्याळी, लोकमान्यनगर, नवली, वेवुर, घोलवीरा, गोठणपुर आदी आठ गावांचा समावेश आहे. सन २०११ च्या जनगणने नुसार नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या ६८ हजार ८८५ इतकी आहे. आॅगस्ट २००९ पासून पालघर शहर व सातपाटी, शिरगाव आदी २६ गावांना नळपाणीपुरवठा योजने मधून जुन्या पाईप लाईन वरून प्रायोगिक तत्वावर पाणीपुरवठा सुरु केला. या योजनेसाठी पुढील तीस वर्षाच्या ज्या लोकसंख्येवर आधारावर योजना तयार करण्यात आली त्या लोकसंख्येच्या दुप्पटीने आकडा पार झाला आहे.वाढते शहरीकरण व औद्योगिकरणा बरोबरीने पालघरला जिल्हा मुख्यालय म्हणून आलेल्या स्वरूपाची भर पडलेली आहे. याच बरोबरीने येत्या चारपाच वर्षात १४० हेक्टरवर जिल्हा मुख्यालय व सुमारे ३०० हेक्टर वर पालघर नवनगर बसणार आहे. सिडको निर्मित हे नवनगर पालघर नगरपरिषदेचाच एक भाग बनणे अपेक्षित आहे. अश्या परिस्थितीत पालघर नगरपरिषदेच्या पाण्याची गरज आताच दुपटीने व आगामी २० वर्षाचा विचार करता अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.या पाशर््वभूमीवर पालघर नागरपरिषदे साठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व दरम्यानच्या कालावधीसाठी सध्या उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या काट्यात वाढ ही अत्यावश्यक बाब बनली आहे. त्या दृष्टीने नगरपरिषदेने जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठवला असून पालक मंत्री विष्णू सवरा ह्यांना कल्पना दिल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत ह्यांनी लोकमतला दिली. त्यामुळे आता पालक मंत्र्यांनी ह्या बाबत पुढाकार घ्यायला हवा.असे आहे पाणीपुरवठ्याचे गणितपालघर व नळपाणीपुरवठा योजना मंजूर करताना या योजनेसाठी कार्यकारी अभियंता भातसा कालवा योजने मधून दररोज ५.४८ एम एलडी पाणीपुरवठ्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. यातील २ एम एलडी इतके पाणी योजनेतील इतर गावांना जाते. व पालघर नागरपरिषदेला केवळ ३.४८ एम एलडी इतकेच पाणी उपलब्ध होत आहे. सध्याची लोकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण दरडोई ३४.८ लिटर्स इतके आहे. शासनाच्या निकषानुसार नागरी भागासाठी दरडोई ७० लीटर इतक्या पाण्याची गरज आहे. ह्या पाशर््वभूमीवर सध्या उपलब्ध होणाऱ्या पाण्याइतकेच अधिक पाणी नगरपरिषद क्षेत्रासाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही योजना तयार करताना ज्या लोकसंख्येच्या आधारावर हि योजना तयार करण्यात आली त्यापेक्षा कित्येक पटीने आताच लोकसंख्या वाढ झाली आहे.त्यामुळे वरील मंजूर कोट्यातून वाढीव लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. नगरपरिषद हद्दीतील १ लाख लोकसंख्या व आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १.२५ लाख लोकसंख्या पाहता दररोज सुमारे १५.७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. शहराचे वाढते नागरिकीकरण पहाता घरगुती नळ कनेक्शन सोबत रहिवासी संकुलासाठीची मोठी मागणी वाढू लागली आहे.पाणीपुरवठा करणे बंधनकारकपालघर शहर हे मुंबई महानगरा लगत असल्याने उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्याने मोठ्या प्रमाणात लोंढेच्या लोंढे पालघर व परिसरात येत आहेत. वर्ष २००१ च्या जनगणने नुसार शहराची लोकसंख्या ५२ हजार ६७० होती. ती २०११ च्या जनगणने नुसार सुमारे ७० हजार इतकी झाली आहे. आज मितीस तरंगती लोकसंख्या धरून या शहराची लोकसंख्या १ लाखाच्या इतकी झाली आहे. अश्यावेळी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती अधिनियम १९६५ चे कलाम ५० अन्वये पाणीपुरवठ्याची योजना तयार करणे आणि विविक्षत मुदतीत पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे नगरपरिषदेला बंधनकारक आहे.