शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:53 IST

वाहनचालकांसह नागरिकांची मागणी : सततच्या दुरूस्तीने पुलावरील थर वाढला

वाडा : तालुक्यातील नद्यांवर असलेल्या जुन्या पुलांची उंची अंत्यत कमी झाल्याने अपघात होऊन काहींचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत. तसेच येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलां वरील संरक्षक कठड्यांची उंची वाढवावी, अशी मागणी चालकांसह नागरिक करीत आहेत.

वाडा तालुक्यात तानसा, वैतरणा, पिंजाळ व देहर्जे अशा चार मुख्य नद्या असून येथून भिवंडी वाडा मनोर हा राज्यमार्ग गेला आहे. या नद्यांवर गेल्या अनेक वर्षापूर्वी पूल बांधलेले आहेत. या पुलांवर संरक्षक कठडे आहेत. मात्र सततच्या होणाऱ्या दुरुस्तीमुळे त्यांची उंची अत्यंत कमी असल्याने या पूलांवरून पडून अपघात झाले आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी या पुलांवरील कठड्यावरून पडून दुचाकी वरील एका तरूणाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच या पूलांवरून पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.तानसा, वैतरणा, पिंजाळ या नद्यांवर गेल्या अनेक वर्षापूर्वी पुले बनवली आहेत. या पुलांवर संरक्षक कठडे आहेत.मात्र त्यांची उंची अत्यंत कमी असल्याने येथे अपघात होत आहेत. ते रोखण्यासाठी कठड्यांची उंची वाढवा.- अनंता वनगा, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनातानसा नदीवरील पुलाच्या कठड्यावरून पडून एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. भविष्यात या पुलांवर मोठे अपघात होऊ शकतात. त्यामुळे संरक्षक कठड्यांची उंची वाढवावी अशी आमची मागणी आहे.- सुरेश भोईर, अध्यक्ष, रिपाई (सेक्युलर), वाडा तालुका

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाVasai Virarवसई विरार