शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

ढासळत्या ‘सूर्या’तून अपुरा पाणीपुरवठा, १० वर्षांत देखभाल दुरुस्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 02:31 IST

डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो.

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे त्याचा शेतीला फटका बसत आहे. कासा जवळील सूर्या नदीवर धामणी येथे ४० वर्षांपूर्वी धरण बांधण्यात आले. सिंचन हा प्रमुख उद्देश ठेऊन हे धरण बांधण्यात आले. आणि १४ हजार ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा हेतू होता.डहाणू तालुक्यातील तवा, पेठ, धामटने, कोल्हान, सोनाळे, खाणीव, कासा, चारोटी, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, उर्से, साये, म्हसाड, दाभोण, ऐना, साखरे, घोळ, भराड,रानशेत, आदी ठिकाणी तर पालघर तालुक्यातील आंबेदा, नानीवली, बºहाणपूर, आकेगव्हान, चिंचारे, सोमटा, बोरशेती, कुकडे, महागाव आदी गावांना अश्या एकूण ७० ते ८० गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा केला जातो. शेतकरी सदर काळव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती बरोबरच भाजीपाला, भुईमूग आदी पिके घेतात. मात्र गेल्या १० वर्षांपासून कालव्यांची दुरु स्तीच केली जात नसल्याने ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत आहे.काही ठिकाणी कालवे उथळ व गेट तुटल्याने पाणी वाया जाते. त्यामुळे शेवटच्या भागापर्यंत पाणी जातच नाही. कालव्यातून होणार पाण्याचा निचरा रोखण्यासाठी मुख्य कालवे व उप कालव्यांचे सिमेंटने बांधकाम केले होते. मात्र, वेळोवेळी दुरु स्ती व सफाई न केल्याने बºयाच ठिकाणी कालव्याचे बांधकाम, प्लॅस्टर वाहून व तुटून गेले आहेत.>अपुरा पाणीपुरवठा; शेतीला बसला फटकासारणी, उर्से म्हसाड, आंबिवली, साये, घोळ, भराड , आदी ठिकाणी तर कालव्यांचे पूर्ण बांधकाम व प्लॅस्टर तुटून गेले आहे. तर पेठ, धामटने, घोळ, नानिवली, चिंचारे, आदी ठिकाणी तर कालव्याचे शेतीला पाणीपुरवठा करणारे गेट नादुरु स्त झाले आहेत तर काही ठिकाणी तुटून गेले आहेत. त्यामुळे ठिक ठिकाणी पाणी शेतीला न जाता वाया जात आहे. तसेच बºयाच ठिकाणी सतत गाळ साचल्याने कालवे नादुरु स्त झाले आहेत. गेट, मोºया गाळाने भरल्याने पाण्याचा निचरा होतो त्यामूळे शेतीला वेळोवेळी पाणीपुरवठा होत नाही. तसेच कालव्यांच्या नादुरु स्ती मुळे कालव्यांना जोडणाºया अखेरच्या गावांना अर्धवट व अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अशा गावांनी दोन वर्षपासून शेती करणे बंद केली आहे. त्यामुळे कालव्यांची दुरु स्ती अभावी शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असून त्याचा फटका शेतीला बसत आहे.