शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

ढासळत्या ‘सूर्या’तून अपुरा पाणीपुरवठा, १० वर्षांत देखभाल दुरुस्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 02:31 IST

डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो.

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे त्याचा शेतीला फटका बसत आहे. कासा जवळील सूर्या नदीवर धामणी येथे ४० वर्षांपूर्वी धरण बांधण्यात आले. सिंचन हा प्रमुख उद्देश ठेऊन हे धरण बांधण्यात आले. आणि १४ हजार ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा हेतू होता.डहाणू तालुक्यातील तवा, पेठ, धामटने, कोल्हान, सोनाळे, खाणीव, कासा, चारोटी, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, उर्से, साये, म्हसाड, दाभोण, ऐना, साखरे, घोळ, भराड,रानशेत, आदी ठिकाणी तर पालघर तालुक्यातील आंबेदा, नानीवली, बºहाणपूर, आकेगव्हान, चिंचारे, सोमटा, बोरशेती, कुकडे, महागाव आदी गावांना अश्या एकूण ७० ते ८० गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा केला जातो. शेतकरी सदर काळव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती बरोबरच भाजीपाला, भुईमूग आदी पिके घेतात. मात्र गेल्या १० वर्षांपासून कालव्यांची दुरु स्तीच केली जात नसल्याने ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत आहे.काही ठिकाणी कालवे उथळ व गेट तुटल्याने पाणी वाया जाते. त्यामुळे शेवटच्या भागापर्यंत पाणी जातच नाही. कालव्यातून होणार पाण्याचा निचरा रोखण्यासाठी मुख्य कालवे व उप कालव्यांचे सिमेंटने बांधकाम केले होते. मात्र, वेळोवेळी दुरु स्ती व सफाई न केल्याने बºयाच ठिकाणी कालव्याचे बांधकाम, प्लॅस्टर वाहून व तुटून गेले आहेत.>अपुरा पाणीपुरवठा; शेतीला बसला फटकासारणी, उर्से म्हसाड, आंबिवली, साये, घोळ, भराड , आदी ठिकाणी तर कालव्यांचे पूर्ण बांधकाम व प्लॅस्टर तुटून गेले आहे. तर पेठ, धामटने, घोळ, नानिवली, चिंचारे, आदी ठिकाणी तर कालव्याचे शेतीला पाणीपुरवठा करणारे गेट नादुरु स्त झाले आहेत तर काही ठिकाणी तुटून गेले आहेत. त्यामुळे ठिक ठिकाणी पाणी शेतीला न जाता वाया जात आहे. तसेच बºयाच ठिकाणी सतत गाळ साचल्याने कालवे नादुरु स्त झाले आहेत. गेट, मोºया गाळाने भरल्याने पाण्याचा निचरा होतो त्यामूळे शेतीला वेळोवेळी पाणीपुरवठा होत नाही. तसेच कालव्यांच्या नादुरु स्ती मुळे कालव्यांना जोडणाºया अखेरच्या गावांना अर्धवट व अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अशा गावांनी दोन वर्षपासून शेती करणे बंद केली आहे. त्यामुळे कालव्यांची दुरु स्ती अभावी शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असून त्याचा फटका शेतीला बसत आहे.