शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वसईत ३० लाख लोकांचा भार चार रुग्णालयांवर; तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2023 11:04 IST

नगीनदास पाड्यातील तुळींज रुग्णालयात ‘लोकमत’ने भेट देऊन रुग्णांच्या सोयी- सुविधा पुरेशा आहेत का, याचा आढावा घेतला.

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसईविरार महापालिका हद्दीत सुमारे ३० लाख लोकसंख्या असून महापालिकेची अवघी चार रुग्णालये आहेत. त्यातही तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव असल्याने रुग्ण आणि नातेवाइकांची फरफट होत आहे.

महापालिकेची सर डी. एम. पेटिट, तुळींज ग्रामीण रुग्णालय, सोपारा रुग्णालय आणि श्री जीवदानी अशी चार रुग्णालये आहेत. यातील नगीनदास पाड्यातील तुळींज रुग्णालयात ‘लोकमत’ने भेट देऊन रुग्णांच्या सोयी- सुविधा पुरेशा आहेत का, याचा आढावा घेतला. मनपा रुग्णालयात सामान्य, गरीब रुग्णांना सेवा देण्यात प्रशासनाची उदासीनता आहे. येथे डॉक्टरांची कमतरता आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर आणि उपचारासाठी महत्त्वाची उपकरणे अजून मिळाली नाहीत. 

मनपाच्या स्थापनपासून म्हणजे १५ वर्षे झाली तरी भूलतज्ज्ञ डॉक्टरचे पद अद्यापही रिक्त आहे. आवश्यक तपासणी उपकरणांचीही वानवा आहे. रात्रीच्या वेळी तर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील कर्मचारी उद्धट पद्धतीने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी बोलतात. रात्रीच्या वेळी डॉक्टर कमी असल्याने रांग लावून डॉक्टरकडे उपचारासाठी जावे लागते.

मनपाकडे अवघ्या  सात रुग्णवाहिका   वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही मोठा आहे. मनपाकडे सध्या सात रुग्णवाहिका आहेत. खासगी आणि स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिकेकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप नागरिक करतात. समाजसेवा करणारे ट्रस्टचे चालक रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपारा