शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वसईत ३० लाख लोकांचा भार चार रुग्णालयांवर; तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2023 11:04 IST

नगीनदास पाड्यातील तुळींज रुग्णालयात ‘लोकमत’ने भेट देऊन रुग्णांच्या सोयी- सुविधा पुरेशा आहेत का, याचा आढावा घेतला.

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसईविरार महापालिका हद्दीत सुमारे ३० लाख लोकसंख्या असून महापालिकेची अवघी चार रुग्णालये आहेत. त्यातही तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव असल्याने रुग्ण आणि नातेवाइकांची फरफट होत आहे.

महापालिकेची सर डी. एम. पेटिट, तुळींज ग्रामीण रुग्णालय, सोपारा रुग्णालय आणि श्री जीवदानी अशी चार रुग्णालये आहेत. यातील नगीनदास पाड्यातील तुळींज रुग्णालयात ‘लोकमत’ने भेट देऊन रुग्णांच्या सोयी- सुविधा पुरेशा आहेत का, याचा आढावा घेतला. मनपा रुग्णालयात सामान्य, गरीब रुग्णांना सेवा देण्यात प्रशासनाची उदासीनता आहे. येथे डॉक्टरांची कमतरता आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर आणि उपचारासाठी महत्त्वाची उपकरणे अजून मिळाली नाहीत. 

मनपाच्या स्थापनपासून म्हणजे १५ वर्षे झाली तरी भूलतज्ज्ञ डॉक्टरचे पद अद्यापही रिक्त आहे. आवश्यक तपासणी उपकरणांचीही वानवा आहे. रात्रीच्या वेळी तर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील कर्मचारी उद्धट पद्धतीने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी बोलतात. रात्रीच्या वेळी डॉक्टर कमी असल्याने रांग लावून डॉक्टरकडे उपचारासाठी जावे लागते.

मनपाकडे अवघ्या  सात रुग्णवाहिका   वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही मोठा आहे. मनपाकडे सध्या सात रुग्णवाहिका आहेत. खासगी आणि स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिकेकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप नागरिक करतात. समाजसेवा करणारे ट्रस्टचे चालक रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपारा