शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

परिवहनचा अदूरदर्शीपणा अर्नाळावासीयांच्या मुळावर

By admin | Updated: November 16, 2015 23:38 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेने सुरू केलेल्या परिवहन सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असला तरी परिवहन प्रशासनाला गाड्या सोडण्याचे वेळापत्रक योग्य पद्धतीने

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने सुरू केलेल्या परिवहन सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असला तरी परिवहन प्रशासनाला गाड्या सोडण्याचे वेळापत्रक योग्य पद्धतीने हाताळता येत नसल्याचे दिसते. अर्नाळा गावात जाण्यासाठी रात्री प्रवाशांच्या रांगा लागत असतात. परंतु, त्याप्रमाणात बसेस मात्र सोडण्यात येत नाहीत. अनेकदा प्रवासी व परिवहन सेवेचे अधिकारी यांच्यामध्ये तू तू - मैं मैं होत असते.रविवारी सुटीच्या दिवशी अर्नाळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना परिवहन सेवेच्या बसेसमधून प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. रात्रीच्या वेळी बसेस सोडण्यासंदर्भात योग्य नियोजन करण्यात येत नसल्यामुळे अर्नाळा ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत, अनेक तक्रारी लोकमतकडे आल्यानंतर प्रतिनिधीने रविवारी विरार रेल्वे स्थानक पश्चिमेच्या बस आगाराला भेट दिली. एसटी महामंडळाच्या आगाराला लागून परिवहन सेवेच्या बसेस उभ्या करण्यात येतात. अर्नाळा येथे जाण्यासाठी स्थानिक प्रवाशांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. परंतु, येथील अधिकाऱ्यांनी अर्नाळ्यासाठी बस न लावता ३ प्रवाशांसाठी सत्पाळा बस उभी करून ठेवली होती. ही बस सुमारे अर्धा तास प्रवाशांच्या प्रतीक्षेत होती. तर, दुसरीकडे अर्नाळ्याचे सुमारे ५० ते ६० प्रवासी ४० ते ५० मिनिटे रांगेत उभे राहून बसची प्रतीक्षा करत होते. विशेष म्हणजे, त्या वेळी रस्त्यालगत ३ ते ४ रिकाम्या बसेस उभ्या होत्या. याबाबत, प्रस्तुत प्रतिनिधीने परिवहन सेवेचे ठेकेदार सकपाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अर्नाळा येथे प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्यामुळे बसेस वेळेवर पोहोचत नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)