शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

रोजगारासाठी स्थलांतरितांचे वास्तव भयानक

By admin | Updated: February 4, 2016 02:04 IST

पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून जरी ओळखला जात असला तरी त्यातील अनेक कुटूंबे रोजगारापासून वंचित राहत आहेत.

पालघर/नंडोरे : पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून जरी ओळखला जात असला तरी त्यातील अनेक कुटूंबे रोजगारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे ती रोजगारासाठी मोठ्या शहरात स्थलांतर करतात. पालघर येथील गोठणपूर भागातल्या दांडेकर मैदानात खेडोपाड्यातून जव्हार, मोखाडा, विक्रमगड अशा ठिकाणाहून गेल्या अनेक वर्षापासून अशी आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतरीत झालेली आहेत. या मैदानात सुमारे १००० ते १२०० लोक सुमारे दिडशे ते तीनशे बांबू, ताडपत्री, गोणपाटे यापासून उभारलेल्या झोपड्यातून राहत आहेत. ही स्थलांतरीत कुटुंबे शहरातील बांधकाम व्यवसायीकांकडे मोलमजुरीसाठी नानातऱ्हेची कामे करताना आढळली. त्यांची मुले एकतर फुटकळ कामे करून रोजगार मिळवतात किंवा आईवडीलांच्या सोबत जाऊन त्यांच्या कामाच्या ठिकाणी खेळतात. त्यामुळे ती शिक्षणापासून वंचित राहतात.एखाद्या दिवशी रोजगार प्राप्त झाला नाही तर एक वेळच्या जेवणावर किंवा कधीकधी उपाशी पोटी राहण्याची वेळ या स्थलांतरीतांवर येते. त्यांच्याकडे रेशनकार्ड, आधारकार्ड यासुविधा निवासाचा पुरावा नसल्याने नाहीत तसेच त्यांची नावे मतदारयादीतही नाहीत. त्यामुळे सर्व शासकीय योजनांपासून ते वंचितच राहिले आहेत. नागरीसुविधा नसल्याने त्यांच्यात आरोग्याच्याही समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या फिरस्त जिवन पद्धतीमुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे मोठे आबाळ होत आहेत. (वार्ताहर) ग्रामपंचायत किंवा तेहींची माणस आमास ईचारीत नाय व हामीही त्यांना इचारीत नाय. तिथ काहीच नाही तर तिथ राहून करायचा तरी काय? इकड पैसे जमावायचा व पावसाळ्यात शेती-भाती किंवा मोलमजुरी करून गुजारा करायचा बस एवढंच आमचं आयुष्य.- सुनिल फसाळे, चालतवड, जव्हार, स्थलांतरीतापैकी एक