शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

पालघर जिल्ह्यात अवैधरीत्या रेती उत्खनन; पर्यावरण, पर्यटन आणि शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 02:10 IST

पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा ११२ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे

हितेन नाईक /अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यात रेती उत्खननाला बंदी असताना, समुद्र आणि नदी पात्रातून अनियंत्रित उपसा सुरू असून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे. त्याचा मोठा फटका येथील पर्यावरण, पर्यटन आणि शेतीला बसत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही हानी सुरू असल्याने त्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा ११२ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यावरील वाळू साठे, मर्यादावेल, सुरू, नारळ, केवडा आदी प्रकारच्या औषधी झुडपांमुळे जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याने हा भाग नटला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातील कळंब, भुईगाव, केळवा, उसरणी, दांडे, चिंचणी, पारनाका, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी या किनाऱ्यांना पर्यटनाचे कोंदण लाभले आहे. मात्र रेतीमाफिया चौपाट्यांवर वाहने उतरवून रेती उपसा करीत असल्याने प्रचंड हानी सुरू आहे.

पात्र रूंदावल्याचा फटकासागरी किनाऱ्यावर कांदळवन, सुरू बागा असून हा भाग जैववीविधतेने नटाला आहे. या सौंदर्यावर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय बहरला आहे. मच्छीमारी व पर्यटन व्यवसाय हे प्रमुख रोजगाराचे स्रोत आहेत. तर किनाऱ्यांप्रमाणेच खाडी भागात शेती व बागायती असल्याने खाडीचे पात्र रुंदवल्यास क्षारयुक्त पाण्याचा शिरकाव होऊन शेतीला फटका बसू शकतो. 

दररोज होणारा वाळूउपसास्थानिक महसूल व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी, बेरोजगार युवक यांना हाताशी धरून व्यवसायाला मजबुती दिली जाते. तर आरटीओ कार्यालयाच्या बेजबाबदार प्रशासनामुळे महामार्गावर अवैधरीत्या रेतीची वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. पर्यावरणाच्या सुरू असलेल्या या हानीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात नाही. 

सततच्या रेती-उपशामुळे नदीपात्र उथळ होतात,  शेवाळ हे नदी व खाडीतील मासे यांचे खाद्य असते. रेती काढताना ती नष्ट होते. रेतीसोबत माशांची अंडी देखील उपसली जातात. यामुळे नदी, खाडीतील माशांच्या संख्येवर परिणाम होतो. सतत रेती काढल्याने नदीचे पाणी गढूळ होते. ज्यामुळे माशांचे खाद्य- शेवाळ वाढत नाही.  - प्रो. भूषण भोईर, पर्यावरण तज्ज्ञ