शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

पालघर जिल्ह्यात अवैधरीत्या रेती उत्खनन; पर्यावरण, पर्यटन आणि शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 02:10 IST

पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा ११२ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे

हितेन नाईक /अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यात रेती उत्खननाला बंदी असताना, समुद्र आणि नदी पात्रातून अनियंत्रित उपसा सुरू असून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे. त्याचा मोठा फटका येथील पर्यावरण, पर्यटन आणि शेतीला बसत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही हानी सुरू असल्याने त्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा ११२ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यावरील वाळू साठे, मर्यादावेल, सुरू, नारळ, केवडा आदी प्रकारच्या औषधी झुडपांमुळे जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याने हा भाग नटला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातील कळंब, भुईगाव, केळवा, उसरणी, दांडे, चिंचणी, पारनाका, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी या किनाऱ्यांना पर्यटनाचे कोंदण लाभले आहे. मात्र रेतीमाफिया चौपाट्यांवर वाहने उतरवून रेती उपसा करीत असल्याने प्रचंड हानी सुरू आहे.

पात्र रूंदावल्याचा फटकासागरी किनाऱ्यावर कांदळवन, सुरू बागा असून हा भाग जैववीविधतेने नटाला आहे. या सौंदर्यावर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय बहरला आहे. मच्छीमारी व पर्यटन व्यवसाय हे प्रमुख रोजगाराचे स्रोत आहेत. तर किनाऱ्यांप्रमाणेच खाडी भागात शेती व बागायती असल्याने खाडीचे पात्र रुंदवल्यास क्षारयुक्त पाण्याचा शिरकाव होऊन शेतीला फटका बसू शकतो. 

दररोज होणारा वाळूउपसास्थानिक महसूल व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी, बेरोजगार युवक यांना हाताशी धरून व्यवसायाला मजबुती दिली जाते. तर आरटीओ कार्यालयाच्या बेजबाबदार प्रशासनामुळे महामार्गावर अवैधरीत्या रेतीची वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. पर्यावरणाच्या सुरू असलेल्या या हानीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात नाही. 

सततच्या रेती-उपशामुळे नदीपात्र उथळ होतात,  शेवाळ हे नदी व खाडीतील मासे यांचे खाद्य असते. रेती काढताना ती नष्ट होते. रेतीसोबत माशांची अंडी देखील उपसली जातात. यामुळे नदी, खाडीतील माशांच्या संख्येवर परिणाम होतो. सतत रेती काढल्याने नदीचे पाणी गढूळ होते. ज्यामुळे माशांचे खाद्य- शेवाळ वाढत नाही.  - प्रो. भूषण भोईर, पर्यावरण तज्ज्ञ