शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात अवैधरीत्या रेती उत्खनन; पर्यावरण, पर्यटन आणि शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 02:10 IST

पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा ११२ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे

हितेन नाईक /अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यात रेती उत्खननाला बंदी असताना, समुद्र आणि नदी पात्रातून अनियंत्रित उपसा सुरू असून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे. त्याचा मोठा फटका येथील पर्यावरण, पर्यटन आणि शेतीला बसत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही हानी सुरू असल्याने त्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा ११२ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यावरील वाळू साठे, मर्यादावेल, सुरू, नारळ, केवडा आदी प्रकारच्या औषधी झुडपांमुळे जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याने हा भाग नटला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातील कळंब, भुईगाव, केळवा, उसरणी, दांडे, चिंचणी, पारनाका, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी या किनाऱ्यांना पर्यटनाचे कोंदण लाभले आहे. मात्र रेतीमाफिया चौपाट्यांवर वाहने उतरवून रेती उपसा करीत असल्याने प्रचंड हानी सुरू आहे.

पात्र रूंदावल्याचा फटकासागरी किनाऱ्यावर कांदळवन, सुरू बागा असून हा भाग जैववीविधतेने नटाला आहे. या सौंदर्यावर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय बहरला आहे. मच्छीमारी व पर्यटन व्यवसाय हे प्रमुख रोजगाराचे स्रोत आहेत. तर किनाऱ्यांप्रमाणेच खाडी भागात शेती व बागायती असल्याने खाडीचे पात्र रुंदवल्यास क्षारयुक्त पाण्याचा शिरकाव होऊन शेतीला फटका बसू शकतो. 

दररोज होणारा वाळूउपसास्थानिक महसूल व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी, बेरोजगार युवक यांना हाताशी धरून व्यवसायाला मजबुती दिली जाते. तर आरटीओ कार्यालयाच्या बेजबाबदार प्रशासनामुळे महामार्गावर अवैधरीत्या रेतीची वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. पर्यावरणाच्या सुरू असलेल्या या हानीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात नाही. 

सततच्या रेती-उपशामुळे नदीपात्र उथळ होतात,  शेवाळ हे नदी व खाडीतील मासे यांचे खाद्य असते. रेती काढताना ती नष्ट होते. रेतीसोबत माशांची अंडी देखील उपसली जातात. यामुळे नदी, खाडीतील माशांच्या संख्येवर परिणाम होतो. सतत रेती काढल्याने नदीचे पाणी गढूळ होते. ज्यामुळे माशांचे खाद्य- शेवाळ वाढत नाही.  - प्रो. भूषण भोईर, पर्यावरण तज्ज्ञ