शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

निरीच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने वसई-विरारमध्ये महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:30 IST

शिवेसेनेचा गंभीर आरोप । महापालिका सत्ताधारी, प्रशासन यांचे मात्र मौन

वसई : वर्षातून फक्त एकदा अथवा दुसऱ्यांदा पूरपरिस्थिती निर्माण होणाºया पालघर जिल्ह्यात तथा वसई तालुक्यात यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यात तब्बल चार वेळा पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि वसईचे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे.

पाऊस त्याचे काम करतोय मात्र महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका मात्र आता येथील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना बसतो आहे मग यात हजारो, दुकाने, घरे आणि कंपन्यांमध्ये पाणी शिरून यावर्षी चार वेळा कोटयावधी रुपयांचा जबरदस्त आर्थिक फटका येथील नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना बसला आहे.

दरम्यान गणेशाच्या आगमनापासून सुरु झालेला पाऊस सतत तीन दिवस पडत राहिल्यामुळे तालुक्यातील नायगाव, वसई, नालासोपारा आणि विरार या चारही शहरांमध्ये कमरे पेक्षाही अधिक पाणी साचले. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने हि पूरपरिस्थिती उद्भवली आहे. मुख्य रस्ते, दुकाने, तळमजल्यावरील घरे, चाळी, रेल्वे स्थानक, वीज मंडळाचे उपकेंद्रे, एस.टी.डेपो, शाळा, तलाव पाण्याने अक्षरश: भरून गेले.तर वसई-विरार स्थानका दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्ण बंद झाल्यामुळे लाखो प्रवाशांना दोन स्थानकां मधील तीन ते चार किमी अंतर रु ळावरून चालत पावसात भिजत कापावे लागले.

वसई डेपोत ही पाणी शिरल्यामुळे एसटी महामंडळाची ही सेवा कालांतराने थंडावली. महावितरणाच्या वसई उपकेंद्रात पाणी साचल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून वसई, नालासोपारा आणि विरार मधील फिडर बुधवारी सकाळपासूनच बंद करण्यात आले.त्यामुळे तालुक्यातील 50 हजार ग्राहक आणि दोन लाखांहून अधिक नागरिक अंधारात होते. एकूणच ही परिस्थिती गेल्या दोन महिन्यात चौथ्यांदा निर्माण झाली असून यंदा वसई बुडणार नाही असा दावा करणाºया महापालिकेचे पितळ आता एकदा नाही तर चौथ्यांदा उघडे पडून देखील महापालिका प्रशासन व त्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना काहीही फरक पडलेला दिसून येत नाही. मुळातच वसई का बुडतेय याचा शोध घेवून त्यावर भविष्यातील व सद्यस्थितीतील उपाय सुचविण्यासाठी महापालिकेने नागरिकांचे १२ कोटी रु पये खर्चून केंद्र शासन पुरस्कृत निरी आणि आयआयटीची मुंबई अशी अभ्यासू यंत्रणा गतवर्षी राबवली होती. या दोन्ही संस्थांनी वसईतील पालिका क्षेत्रातील नाले, खाडयांची रु ंदी वाढवणे व काही अतिक्रमणे हटविण्याचा सल्ला दिला. मात्र निरीने दिलेल्या सल्ल्यानुसार कुठलीच कार्यवाही अद्याप महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही, त्यातच आजवर नाल्यांवरील अतिक्र मणे सुद्धा हटवली गेली नाही.

नियोजनशून्यतातसेच नालेसफाई करून त्यातून काढलेला गाळ नाल्याजवळच ठेवला जात असल्याने हाच गाळ पुन्हा त्याच नाल्यात जमा झाल्यामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली असून, शिवसेनेच्या मते बोगस सत्यशोधन समिती आणि पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळेच वसई पुन्हा- पुन्हा बुडते आहे आणि तुंबतही असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे वसई शहर उपप्रमुख मिलींद चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार