शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्र कामगारांना कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 23:28 IST

केंद्रात एका मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे मागील चार वर्षांपासून काम करणा-या घिवली गावातील ७१ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू

बोईसर : तारापूर येथील भाभा अणू संशोधन केंद्रात एका मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे मागील चार वर्षांपासून काम करणा-या घिवली गावातील ७१ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.तारापूर येथे भाभा अणू संशोधन केंद्रात मागील चार वर्षांपासून इंटरग्रेटेड न्यूक्लियर रिसायकल प्लांट (आयपी) सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असून याकरिता सुमारे १२०० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. यामध्ये तारापूर बीएआरसी लगत असलेल्या घिवली गावातील प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित असे मिळून एकूण सुमारे २१० कंत्राटी कामगार मागील ४ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यापैकी ७१ कंत्राटी कामगारांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे.या घटनेनंतर घिवली गावातील भूमिपुत्र असलेल्या व एचसीसीमध्ये काम करणाºया सर्व कंत्राटी कामगारांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकाºयांकडेही बैठक झाली. खासदार राजेंद्र गावित यांनी बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्या कार्यालयात हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी संतोष कुमार व संजय गोरे यांच्यासोबत बैठक घेतली. या वेळी तारापूर पोलीस स्थानकाचे स. पोलीस निरीक्षक जाधव, शिवसेनेचे पालघर विधानसभेचे संघटक वैभव संखे, शिवसेनेचे देवा मेहेर व काही सेना पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी खा. गावितांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाºयांना तुम्ही असे कुठल्याही कामगारांना कामावरून काढू शकत नाही, असे सांगून अकुशल कामगारांना सुधारण्याची संधी द्या व संधी देऊनही सुधारत नसतील तर काढून टाका, जर संधी दिली गेली नाही तर प्रोजेक्ट बंद करून जावे लागेल, असा इशारा गावित यांनी दिला. तडकाफडकी काढलेले हे कामगार ४ वर्ष लायक होते का? असे गावितांनी विचारून आपणाला हा प्रश्न सोडवायचा आहे की रेंगाळत ठेवायचा आहे, असा प्रश्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, असे सांगितले. मालकाला बैठकीला बोलवा, अशी मागणी गावितांनी अधिकाºयांकडे करताच ते बैठकीला येऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगताच या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने चर्चा करण्यासाठी मालकाला यावेच लागेल, असे खडसावून सांगितले.>बीएआरसीमध्ये कोणत्याही कंत्राटदाराकडे काम करणाºया कामगारांचे पास जर जमा करायचे असतील तर ते पास प्रथम कंत्राटदार कंपनीने स्वत:कडे घेऊन बीएआरसी प्रशासनाच्या मान्यतेनंतर सीआयएसएफकडे रद्द करण्यासाठी देणे आवश्यक आहे असा नियम आहे, परंतु या प्रकरणात सीआयएसएफने परस्पर आपल्या हातात कामगारांची यादी घेऊन सकाळी कामावर जात असताना कामगारांकडून गेटपास जबरदस्तीने घेतले हे अन्यायकारक आहे. - वैभव मोरे, उपसरपंच, घिवली