शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भूमिपुत्र कामगारांना कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 23:28 IST

केंद्रात एका मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे मागील चार वर्षांपासून काम करणा-या घिवली गावातील ७१ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू

बोईसर : तारापूर येथील भाभा अणू संशोधन केंद्रात एका मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे मागील चार वर्षांपासून काम करणा-या घिवली गावातील ७१ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.तारापूर येथे भाभा अणू संशोधन केंद्रात मागील चार वर्षांपासून इंटरग्रेटेड न्यूक्लियर रिसायकल प्लांट (आयपी) सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असून याकरिता सुमारे १२०० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. यामध्ये तारापूर बीएआरसी लगत असलेल्या घिवली गावातील प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित असे मिळून एकूण सुमारे २१० कंत्राटी कामगार मागील ४ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यापैकी ७१ कंत्राटी कामगारांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे.या घटनेनंतर घिवली गावातील भूमिपुत्र असलेल्या व एचसीसीमध्ये काम करणाºया सर्व कंत्राटी कामगारांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकाºयांकडेही बैठक झाली. खासदार राजेंद्र गावित यांनी बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्या कार्यालयात हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी संतोष कुमार व संजय गोरे यांच्यासोबत बैठक घेतली. या वेळी तारापूर पोलीस स्थानकाचे स. पोलीस निरीक्षक जाधव, शिवसेनेचे पालघर विधानसभेचे संघटक वैभव संखे, शिवसेनेचे देवा मेहेर व काही सेना पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी खा. गावितांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाºयांना तुम्ही असे कुठल्याही कामगारांना कामावरून काढू शकत नाही, असे सांगून अकुशल कामगारांना सुधारण्याची संधी द्या व संधी देऊनही सुधारत नसतील तर काढून टाका, जर संधी दिली गेली नाही तर प्रोजेक्ट बंद करून जावे लागेल, असा इशारा गावित यांनी दिला. तडकाफडकी काढलेले हे कामगार ४ वर्ष लायक होते का? असे गावितांनी विचारून आपणाला हा प्रश्न सोडवायचा आहे की रेंगाळत ठेवायचा आहे, असा प्रश्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, असे सांगितले. मालकाला बैठकीला बोलवा, अशी मागणी गावितांनी अधिकाºयांकडे करताच ते बैठकीला येऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगताच या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने चर्चा करण्यासाठी मालकाला यावेच लागेल, असे खडसावून सांगितले.>बीएआरसीमध्ये कोणत्याही कंत्राटदाराकडे काम करणाºया कामगारांचे पास जर जमा करायचे असतील तर ते पास प्रथम कंत्राटदार कंपनीने स्वत:कडे घेऊन बीएआरसी प्रशासनाच्या मान्यतेनंतर सीआयएसएफकडे रद्द करण्यासाठी देणे आवश्यक आहे असा नियम आहे, परंतु या प्रकरणात सीआयएसएफने परस्पर आपल्या हातात कामगारांची यादी घेऊन सकाळी कामावर जात असताना कामगारांकडून गेटपास जबरदस्तीने घेतले हे अन्यायकारक आहे. - वैभव मोरे, उपसरपंच, घिवली