शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

तीन दिवस जिल्ह्यावर चक्रीवादळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:11 IST

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला

ठाणे/पालघर : अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्र ीवादळ निर्माण झाले आहे. ते ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. त्यामुळे त्यापासून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ठाणे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून तयारीचा आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी ठाणे जिल्हा प्रशासनास जारी केले. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्कालीन यंत्रणांना सज्ज व सतर्क राहण्याचे आदेश दिले.

या कालावधीत मच्छीमारांसह पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, कर्मचाºयांनी मुख्यालय सोडू नये तसेच रजेवर असणाºयांनी हजर होण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्यासह महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे सीईओ, टीडीआरएफ, बांधकाम, आरोग्य अधिकारी आदी अधिकाºयांसह पोलीस अधिकारीदेखील या बैठकीला होते.रहिवाशांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करायावेळी चक्र ीवादळामुळे अतिवृष्टीचा अंदाज असून खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनाºयालगतच्या गावांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पत्र्यांची, कच्ची घरे, झोपड्यांमध्ये राहणाºया नागरिकांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करणे, शेतकºयांनी काढून ठेवलेली पिके आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये : चक्रीवादळाच्या संकटावर मात करण्यासाठी तीन दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या (एनडीआरएफ) पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार