शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस जिल्ह्यावर चक्रीवादळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:11 IST

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला

ठाणे/पालघर : अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्र ीवादळ निर्माण झाले आहे. ते ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. त्यामुळे त्यापासून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ठाणे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून तयारीचा आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी ठाणे जिल्हा प्रशासनास जारी केले. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्कालीन यंत्रणांना सज्ज व सतर्क राहण्याचे आदेश दिले.

या कालावधीत मच्छीमारांसह पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, कर्मचाºयांनी मुख्यालय सोडू नये तसेच रजेवर असणाºयांनी हजर होण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्यासह महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे सीईओ, टीडीआरएफ, बांधकाम, आरोग्य अधिकारी आदी अधिकाºयांसह पोलीस अधिकारीदेखील या बैठकीला होते.रहिवाशांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करायावेळी चक्र ीवादळामुळे अतिवृष्टीचा अंदाज असून खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनाºयालगतच्या गावांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पत्र्यांची, कच्ची घरे, झोपड्यांमध्ये राहणाºया नागरिकांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करणे, शेतकºयांनी काढून ठेवलेली पिके आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये : चक्रीवादळाच्या संकटावर मात करण्यासाठी तीन दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या (एनडीआरएफ) पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार