शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

तीन दिवस जिल्ह्यावर चक्रीवादळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:11 IST

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला

ठाणे/पालघर : अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्र ीवादळ निर्माण झाले आहे. ते ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. त्यामुळे त्यापासून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ठाणे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून तयारीचा आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी ठाणे जिल्हा प्रशासनास जारी केले. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्कालीन यंत्रणांना सज्ज व सतर्क राहण्याचे आदेश दिले.

या कालावधीत मच्छीमारांसह पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, कर्मचाºयांनी मुख्यालय सोडू नये तसेच रजेवर असणाºयांनी हजर होण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्यासह महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे सीईओ, टीडीआरएफ, बांधकाम, आरोग्य अधिकारी आदी अधिकाºयांसह पोलीस अधिकारीदेखील या बैठकीला होते.रहिवाशांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करायावेळी चक्र ीवादळामुळे अतिवृष्टीचा अंदाज असून खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनाºयालगतच्या गावांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पत्र्यांची, कच्ची घरे, झोपड्यांमध्ये राहणाºया नागरिकांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करणे, शेतकºयांनी काढून ठेवलेली पिके आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये : चक्रीवादळाच्या संकटावर मात करण्यासाठी तीन दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या (एनडीआरएफ) पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार