शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोची शेकडो कामे अपूर्ण

By admin | Updated: December 16, 2014 22:59 IST

आदिवासींच्या विकासासाठी शासन करोडो रू. खर्च करीत आहे. पाण्यासाठी नवनवीन योजना केल्या जात आहे व जनसुविधेतून विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम शासनस्तरावर केले

विक्रमगड : आदिवासींच्या विकासासाठी शासन करोडो रू. खर्च करीत आहे. पाण्यासाठी नवनवीन योजना केल्या जात आहे व जनसुविधेतून विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम शासनस्तरावर केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र तालुक्यात आजही रोजगार हमी योजना, जलस्वराज्य योजना, स्मशानभूमी, नळपाणीपुरवठा, अंगणवाड्या या अपूर्ण अवस्थेत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या योजना पूर्ण का झाल्या नाहीत त्याबाबत देखरेख करणारी यंत्रणाच सक्षम नसल्याचे दिसून येत आहे.आदिवासीच्या विकासाच्या गप्पा केल्या जातात. कागदी घोडे नाचविले जातात परंतु प्रत्यक्षात मात्र विदारक चित्र दिसून येत आहे. तालुक्यात २०११-१२ पासून रोजगार हमीच्या ५९९ विहिरी, ५६ रस्ते अर्धवट आहेत. तर जिल्हा नियोजन, नाबार्ड आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २०१०-११ ते आजतागायत ९७ अंगणवाड्या मंजूर असताना ५५ अंगणवाड्या अपूर्ण आहेत. तर २२ अंगणवाड्यांच्या निधी वापरला गेला आहे. जनसुविधेच्या स्मशानभूमी अर्धवट तर जलस्वराज्य योजनेच्या झालेला बट्याबोळ अनेक योजना अर्धवट अवस्थेत असताना नळपाणीपुरवठाच्याही ४ ते ५ योजना अर्धवट अवस्थेत आहे. या सर्व योजनाची प्रगती केव्हा होणार की होणार नाही या पार्श्वभूमीवर प्रयोगशील आनंदायी आणि आरोग्यदायी शिक्षणासाठी रोजगारासाठी अजून आदिवासींना किती वर्ष वाट पाहावी लागणार आहे असा सवाल होत आहे.याबाबत गटविकास अधिकारी व्ही. के. पिंपळे यांना विचारले असता या योजना अपूर्ण आहेत ही सत्य परिस्थिती असून त्या पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जाणार आहे पंचायत स्तरावर या योजना पूर्ण होणार नसतील व आदिवासी विकास होणार नसेल तर पंचायत समितीचा काय उपयोग यासाठी येत्या ८ दिवसात पंचायत समितीला टाळे लावण्यात येणार असल्याची माहिती तालुका शिवसेना प्रमुख सुनिल पोतदार यांनी दिली. (वार्ताहर)