शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

रोहयोची शेकडो कामे अपूर्ण

By admin | Updated: December 16, 2014 22:59 IST

आदिवासींच्या विकासासाठी शासन करोडो रू. खर्च करीत आहे. पाण्यासाठी नवनवीन योजना केल्या जात आहे व जनसुविधेतून विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम शासनस्तरावर केले

विक्रमगड : आदिवासींच्या विकासासाठी शासन करोडो रू. खर्च करीत आहे. पाण्यासाठी नवनवीन योजना केल्या जात आहे व जनसुविधेतून विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम शासनस्तरावर केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र तालुक्यात आजही रोजगार हमी योजना, जलस्वराज्य योजना, स्मशानभूमी, नळपाणीपुरवठा, अंगणवाड्या या अपूर्ण अवस्थेत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या योजना पूर्ण का झाल्या नाहीत त्याबाबत देखरेख करणारी यंत्रणाच सक्षम नसल्याचे दिसून येत आहे.आदिवासीच्या विकासाच्या गप्पा केल्या जातात. कागदी घोडे नाचविले जातात परंतु प्रत्यक्षात मात्र विदारक चित्र दिसून येत आहे. तालुक्यात २०११-१२ पासून रोजगार हमीच्या ५९९ विहिरी, ५६ रस्ते अर्धवट आहेत. तर जिल्हा नियोजन, नाबार्ड आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २०१०-११ ते आजतागायत ९७ अंगणवाड्या मंजूर असताना ५५ अंगणवाड्या अपूर्ण आहेत. तर २२ अंगणवाड्यांच्या निधी वापरला गेला आहे. जनसुविधेच्या स्मशानभूमी अर्धवट तर जलस्वराज्य योजनेच्या झालेला बट्याबोळ अनेक योजना अर्धवट अवस्थेत असताना नळपाणीपुरवठाच्याही ४ ते ५ योजना अर्धवट अवस्थेत आहे. या सर्व योजनाची प्रगती केव्हा होणार की होणार नाही या पार्श्वभूमीवर प्रयोगशील आनंदायी आणि आरोग्यदायी शिक्षणासाठी रोजगारासाठी अजून आदिवासींना किती वर्ष वाट पाहावी लागणार आहे असा सवाल होत आहे.याबाबत गटविकास अधिकारी व्ही. के. पिंपळे यांना विचारले असता या योजना अपूर्ण आहेत ही सत्य परिस्थिती असून त्या पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जाणार आहे पंचायत स्तरावर या योजना पूर्ण होणार नसतील व आदिवासी विकास होणार नसेल तर पंचायत समितीचा काय उपयोग यासाठी येत्या ८ दिवसात पंचायत समितीला टाळे लावण्यात येणार असल्याची माहिती तालुका शिवसेना प्रमुख सुनिल पोतदार यांनी दिली. (वार्ताहर)