शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

शेकडो इमारती तहानलेल्या! पालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:41 IST

नालासोपारावासीयांना घ्यावे लागते विकतचे पाणी : पालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा नाही

मंगेश कराळे 

नालासोपारा : वसई-विरार शहर महापालिकेकडून मुबलक पाणी असल्याचा दावा केला जात असताना नालासोपारा परिसरातील शेकडो इमारती आजही तहानलेल्या आहेत. पाण्यासाठी त्यांना महिन्याला हजारो रुपये खर्च करून आपली तहान भागवावी लागत आहे. विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने या परिसरात टँकरमाफियाही आपले पाय रोवत आहेत. या परिसरात पाण्यासाठी टँकर माफिया एका टँकरला एक हजार रुपये ते बाराशे रुपये आकारतात.

नालासोपारातील पूर्व आणि पश्चिमेकडील परिसरात शेकडो इमारती गेल्या १० ते १२ वर्षांत उभ्या राहिल्या आहेत. या इमारती वसवताना महापालिकेने कानाडोळा केला. आता या इमारतींमध्ये लाखो रुपये खर्च करून अनेकांनी घरे घेतली, तर महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन विकासकांनी दिले. पण आता अनेक वर्षांचा काळ उलटला; परंतु अनेक इमारतीला महापालिकेची नळजोडणी मिळालेली नाही. उलट त्यांना टँकरने पाणीपुरवठा करून विकासक आणि टँकरमाफिया यांनी मोठी माया जमवली आहे.वसई आणि विरार शहरापेक्षा नालासोपारा शहरातील मतदारांची संख्या जास्त आहे. पण प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाण्याचे आश्वासन देऊन मते पदरात पडून घेण्याचे काम राजकीय पुढारी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पाण्यावरच राजकारण करीत सत्ताधारी पक्ष सत्ता गाजवत आहे. पूर्वेकडील परिसर अधिक लोकवस्तीचा असून येथील नागरिक आजही आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागवत आहेत. टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य नसल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न सतावत आहे. असे असतानाही महापालिका या नागरिकांना पाण्याची व्यवस्था करीत नाही. काही ठिकाणी सार्वजनिक पाण्याचे नळ आहेत, पण त्यांना पाणी येत नाही, अशी स्थिती आहे.पाण्याच्या बाबतीत कोणतेही राजकारण कुणी करू नये. नळ कनेक्शन देताना कोणी त्रास देत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल, तर रहिवाशांनी माझ्याशी किंवा आमदारांशी संपर्क साधावा. सर्वांना पाणी मिळावे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही गैरप्रकारांना थारादेणार नाही.- प्रवीण शेट्टी, महापौर,वसई-विरार महानगरपालिका 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार