शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

गारपीट, वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 23:33 IST

शहापूरमधील नुकसानग्रस्त गावांत पंचनामे सुरू

भातसानगर : शहापूर तालुक्यात रविवारी संध्याकाळी आलेल्या वादळीवारा व गारपिटीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अजनुप व शिरोळ या गावांतील घरांवरील पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना दिले आहेत.

काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शिरोळ व अजनुप या गावांतील चार घरांचे पत्रे उडून गले आहेत, तर अन्य चौदा घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. यामध्ये शिरोळ या गावातील कैलास चौधरी यांचे ३४ हजार रुपये तर भाऊ धापटे यांचे ३८,५०० तर अजनुप गावातील हाल्या गावंडे यांचा ५७ हजार ४०० तर कैलास गोतरणे यांच्या ८६ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे, इतर १४ घरांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. यात एकूण दाेन लाख ८२ हजार २०० रुपयांचे नुकसानीचे पंचनामे तलाठी उज्ज्वला दराणे यांनी तत्काळ केले आहेत. या वर्षी निसर्गानेही मानवाकडे पाठ फिरविली असून, तिचे कोणत्या कोणत्या रूपाने दर्शन होत आहे. या वर्षी पडलेला महापूर पाऊस, त्यात अवकाळी पाऊस, सतत बदलते ढगाळ वातावरण, त्यात कोरोना महामारी आणि आता वादळीवारे आणि गारपीट यामुळे शेतकरी व नागरिकही चिंतातुर झाले आहेत. थोड्याच दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने, आगोठाची कामे आटोपण्याच्या तयारीत असतानाच, हे नुकसान म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती आहे. हे नुकसान कसे भरून काढायचे याच्या चिंतेत आता ग्रामस्थ सापडले आहेत. आधीच काेराेनामुळे सर्व ठप्प झाले असताना या आस्मानी संकटाला कसे सामाेरे जायचे हा प्रश्न सतावत आहे.

आताच घराची कामे पूर्ण केली होती. आता आमच्या घरावरील छप्पर उडून गेले आहे. त्यामुळे आम्ही आता राहायचे कुठे, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.     - कैलास गोतरणे, अजनुपघरावर एकही पत्रा शिल्लक राहिला वर्षभरासाठी ठेवलेलं सर्व धान्य व इतर वस्तू यांची पार वाट लागली आहे. त्यामुळे आता आम्हाला लवकर नुकसान भरपाई मिळावी.    - हाल्या गावंढा

मुरबाड : कोरोना महामारीमुळे भयभीत झालेले असतानाच रविवारी वादळी पावसाने व गारपिटीने तालुक्यातील आल्याची वाडी, मेर्दी, न्याहाडी, मोधळवाडी, कोळेवाडी, वाल्हिवरे परिसरात १५० घरांचे नुकसान झाले आहे. यामध्मध्ये १० ते १५ घरांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तहसीलदार अमाेर कदम आणि त्यांचे पथक व आमदार किसन कथाेरे यांनी परिसराची पाहणी केली.

काेराेनाच्या महामारीमुळे आधीच उत्पन्नाचे स्राेत बंद झाले असताना पीडित कुटुंबे हतबल झाली आहेत. अनेक घरांचे छप्परच उडून गेले आहेत. तर काही घरांच्या भिंती काेसळल्याने कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. गारपीट झाल्याने सर्वत्र गारांचा सडा पडलेला दिसत हाेता. या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून पीडितांना तातडीने जीवनावश्यक वस्तू आणि मोफत धान्यपुरवठा तसेच आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी दिले. दोन वर्षे कोरोना या महामारीने सर्वसामान्य जनतेचा रोजगार हिरावल्याने पोटभर अन्न मिळवणेही अवघड झाले आहे. त्यातच काल झालेल्या वादळी पावसाने व गारपिटीमुळे घरांचे छप्परही उडून गेले असल्याने आदिवासी बांधव हा संकटात सापडला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार