शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

२५ हजारांचे एकरकमी वीजबिल भरावे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:28 IST

महावितरणला साकडे : ग्राहकांना मनस्ताप

बोर्डी : कॅफेचे प्रतिमहिना येणारे वीजबील मीटर रिडिंगनुसार नसून सरासरी पेक्षा कमी येते. तथापि चार-पाच महिन्यांचे एकत्रित बील आल्यास मोठी रक्कम भरणे अशक्य होईल असे निवेदन अभिलाषा बाफना या उद्योजिकेने नोव्हेंबर महिन्यात दिले होते. मात्र, महावितरणने वेळीच दखल न घेतल्याने पाच महिन्यांचे २५ हजारांचे बील भरावे कसे असा सवालकरीत, या विभागाच्या पालघर कार्यालयात तिने तक्र ार नोंदवली आहे.

शहरातील महालक्ष्मी प्लाझा येथे बाईट जंक्शन नावाचा कॅफे अभिलाष बाफना चालवितात. त्यांना प्रतिमाहिना चार ते पाच हजार बील येणे अपेक्षति आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात अकराशे रु पये बील आले. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिल्यास सहा महिन्यांनी मोठ्या रकमेचे बील येऊ शकते. हा संभाव्य धोका लक्षात घेतल्यास, आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तथापी महावितरणच्या डहाणू कार्यालयात अर्ज केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु जानेवारी उलटूनही त्यामध्ये बदल झाला नाही. नाईलाजास्तव त्यांनी प्रत्येक महिन्यात येणारी बिलांची रक्कम अदा केली.

१४ फेब्रुवारी रोजी २५ हजारांचे बील एकत्र भरण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यांनी या बाबत आॅनलाईन तक्र ार केल्याचे म्हटले आहे. तर २५ फेब्रुवारीला पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे कॅफे चालविणे कठीण बनून, आर्थिक समस्येला सामोरे जावे लागेल. त्याविषयी पुढच्याच दिवशी पालघरच्या कार्यालयात पुन्हा तक्र ारीद्वारे दाद मागितल्यावर जोडणी पूर्ववत करण्यात आली. दरम्यान आपणास आलेले बील योग्य आहे, परंतु एवढी रक्कम एकत्र भरण्याऐवजी तीन-चार हफत्यांची सवलत देण्याचा प्रस्ताव बाफना यांनी ठेवला आहे. तो मान्य होईल अशी माहिती या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खाजगीत बोलताना दिली. 

वापरलेल्या रिडींग पेक्षा वीज बील कमी येत होते. शिवाय बिलावर रीडिंगचा फोटोही नव्हता. चार-पाच महिन्यांचे बील एकत्र आल्यास आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने योग्य दखल घेण्याची मागणी कार्यालयाकडे केली होती. परंतु दखल घेतली नाही. फेब्रुवारीत २५ हजारांचे बील भरण्याचे सांगत, सोनावणे नावाच्या कर्मचाऱ्याने उद्धट उत्तर दिले. या समस्येविषयी पालघर कार्यालयात तक्र ार नोंदवली आहे.-अभिलाषा बाफना(कॅफे मालक)