शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पोषण आहार २२ रुपयांत देणार कसा?

By admin | Updated: November 23, 2015 01:01 IST

केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील कुपोषित बालकांचा प्रश्न सध्या थट्टेचा केलेला दिसतो. कारण, वाढते कुपोषण रोखण्यासाठी कुपोषित बालकांच्या मातांना एकवेळचा पोषण

दीपक मोहिते, वसईकेंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील कुपोषित बालकांचा प्रश्न सध्या थट्टेचा केलेला दिसतो. कारण, वाढते कुपोषण रोखण्यासाठी कुपोषित बालकांच्या मातांना एकवेळचा पोषण आहार देण्यासाठी सरकारने अवघ्या २२ रु.ची तरतूद केली आहे. या २२ रु.मध्ये पोषण आहार कसा बसवायचा, अशा विवंचनेत संबंधित विभागाचे अधिकारी सापडले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने हा तुघलकी निर्णय घेतला आहे.यापूर्वी कुपोषित बालकांसाठी असलेल्या ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) व बालोपचार केंद्र (सीटीसी) या दोन महत्त्वाच्या योजना केंद्र सरकारने बासनात गुंडाळल्या. यामागची कारणे अद्याप कळू शकली नाही. त्याअगोदर ‘अन्न घरी घेऊन जा’ (टीएचआर) योजना कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु, त्या वेळच्या आघाडी सरकारचा हा प्रयत्न फसला. या योजनेतील आहाराच्या दर्जामुळे आदिवासी मातांनी त्याकडे पाठ फिरवली. २० वर्षांपूर्वी युतीच्या राजवटीत जनसंजीवनी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत महिलांना ७०० रु.ची आर्थिक मदत दिली जात होती. त्यानंतर, आलेल्या आघाडी सरकारने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरोदर महिलांना बाळंतपणापूर्वी २ हजार व बाळंतपणानंतर २ हजार असे एकूण ४ हजार रु. देण्यात येत होते. परंतु, या दोन्ही योजना सदोष ठरल्यामुळे त्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, आता युती सरकारने गरोदर महिलांना २२ रु.त पोषण आहार देण्याचे जाहीर केले आहे. या पोषण आहारामध्ये पोळी किंवा भाकरी, कडधान्य, डाळी, सोया, दूध, शेंगदाणालाडू, साखर, गूळ, नाचणीचा हलवा, अंडी, केळी, फळे, पालेभाज्या, खाद्यतेल, आयोडिनयुक्त मीठ व मसाला इ.चा समावेश आहे. हे सर्व पदार्थ २२ रु.मध्ये देता येतील का, यावर सध्या विचारमंथन सुरू आहे. हा आहार डॉ. अब्दुल कलाम अमृत योजनेंतर्गत बाळंतपणाच्या अगोदर ३ व नंतर ३ महिने दररोज आदिवासी मातांना देण्यात येणार आहे. बंद करण्यात आलेल्या ‘अन्न घरी घेऊन जा’ योजनेचा आर्थिक निधीही या योजनेकडे वळवण्यात येणार आहे. एकूण १६ आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये ८५ एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पातर्फे ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेवर आदिवासी विकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे नियंत्रण राहणार आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत सर्वत्र साशंकता व्यक्त होत आहे.