शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा खाडीपूल किती बळी घेणार? एक्स्प्रेसची धडक लागून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:20 IST

आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली.

पालघर : आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. शासन, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष अजून किती बळी घेणार अशी विचारणा वाढीववासी करत आहेत.वाढीव येथील बेबी बाई भोईर या १ आॅगस्ट रोजी पालघरमध्ये रुग्णालयात दाखल आपल्या मुलीला डबा घेऊन जात होत्या. वैतरणा खाडीवरील एकमेव मार्ग असलेल्या या रेल्वे ट्रॅक जवळच्या मार्गावरून जात असताना पाय घसरून त्या खाली पडल्या. त्यांचा मृतदेह ४ दिवसांनंतर अर्नाळा भागात सापडला. गुरुवारी त्यांचे दिवस श्राद्ध होते. त्यांच्याच श्राद्ध कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी सकाळी खार्डी गावातील रमेश माळी सकाळीच घरातून वाढीवला जाण्यासाठी निघाले. वैतरणा स्टेशन पुलावरून ते दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असणाºया मोकळ्या जागेतून वाढीवच्या दिशेने जात असताना मागून येणाºया सौराष्ट्र एक्सप्रेसने त्यांना हॉर्न दिला. यामुळे माळी खाली बसले. मात्र, अत्यंत वेगाने आलेल्या एक्स्प्रेसने त्यांच्या डोक्याला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अशा अपघाताच्या घटनांनी शेकडोंचा आकडा पार केला असून रेल्वे पूल अथवा पर्यायी मार्ग उभारण्याच्या त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अजून या शासनाला किती बळी हवेत असा उद्विग्न सवाल अमित पाटील यांनी उपस्थित केला आहे.पश्चिम रेल्वेच्या वैतरणा आणि सफाळे दरम्यान वैतरणा खाडीमध्ये वसलेले वाढीव-वैती पाडा हे सुमारे २ हजार लोकसंख्येचे गाव. २५-३० वर्षांपासून पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय अशा महत्त्वपूर्ण समस्यांनी ग्रासलेले आहे. वाढीव गाव शासनाच्या महसूल विभागाच्या नोंदीवर असले तरी जगण्यासाठी लागणा-या साध्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे स्वारस्य शासनाने दाखवलेले नाही. सुमारे २ हजार लोकसंख्येचे हे गाव किड्यामुंग्याप्रमाणे जीवन जगत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार