शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

वैतरणा खाडीपूल किती बळी घेणार? एक्स्प्रेसची धडक लागून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:20 IST

आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली.

पालघर : आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. शासन, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष अजून किती बळी घेणार अशी विचारणा वाढीववासी करत आहेत.वाढीव येथील बेबी बाई भोईर या १ आॅगस्ट रोजी पालघरमध्ये रुग्णालयात दाखल आपल्या मुलीला डबा घेऊन जात होत्या. वैतरणा खाडीवरील एकमेव मार्ग असलेल्या या रेल्वे ट्रॅक जवळच्या मार्गावरून जात असताना पाय घसरून त्या खाली पडल्या. त्यांचा मृतदेह ४ दिवसांनंतर अर्नाळा भागात सापडला. गुरुवारी त्यांचे दिवस श्राद्ध होते. त्यांच्याच श्राद्ध कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी सकाळी खार्डी गावातील रमेश माळी सकाळीच घरातून वाढीवला जाण्यासाठी निघाले. वैतरणा स्टेशन पुलावरून ते दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असणाºया मोकळ्या जागेतून वाढीवच्या दिशेने जात असताना मागून येणाºया सौराष्ट्र एक्सप्रेसने त्यांना हॉर्न दिला. यामुळे माळी खाली बसले. मात्र, अत्यंत वेगाने आलेल्या एक्स्प्रेसने त्यांच्या डोक्याला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अशा अपघाताच्या घटनांनी शेकडोंचा आकडा पार केला असून रेल्वे पूल अथवा पर्यायी मार्ग उभारण्याच्या त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अजून या शासनाला किती बळी हवेत असा उद्विग्न सवाल अमित पाटील यांनी उपस्थित केला आहे.पश्चिम रेल्वेच्या वैतरणा आणि सफाळे दरम्यान वैतरणा खाडीमध्ये वसलेले वाढीव-वैती पाडा हे सुमारे २ हजार लोकसंख्येचे गाव. २५-३० वर्षांपासून पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय अशा महत्त्वपूर्ण समस्यांनी ग्रासलेले आहे. वाढीव गाव शासनाच्या महसूल विभागाच्या नोंदीवर असले तरी जगण्यासाठी लागणा-या साध्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे स्वारस्य शासनाने दाखवलेले नाही. सुमारे २ हजार लोकसंख्येचे हे गाव किड्यामुंग्याप्रमाणे जीवन जगत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार