शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वाड्यातील होरबिगर कंपनी व्यवस्थापन नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:27 IST

उपोषणकर्त्या कामगारांच्या सर्व मागण्या मान्य : मान्यवरांच्या हस्ते उपोषण समाप्त

वाडा : तालुक्यातील वडवली- मुसारणे ग्रामपंचायत हद्दीतील होरबिगर इंडिया प्रेसिजन कंपनी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. याबाबत तिसऱ्या दिवशी कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेऊन अखेर उपोषणकर्त्या कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.निलंबित केलेल्या कामगारांना तत्काल कोर्टाच्या आदेशान्वये कामावर घेण्यात येईल, विनाकारण कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार व लेटरबाजी केली जाणार नाही. कामगारांचा मानसिक व शारीरिक छळ कधी केला जात नाही, यापुढेही केला जाणार नाही. कंपनी बंद केली जाणार नाही, प्रासंगिक पत्रव्यवहार उभयपक्षी स्वीकारला जाईल. कंपनीतील चालू स्थितीतील मशीन बाहेर नेल्या जाणार नाहीत, बंद स्थितीतील मशीन बाहेर नेताना युनियनशी चर्चा केली जाईल. कामगारांना भविष्य निर्वाह निधी नियमानुसार व कायदेशीर दिला जाईल. कंपनी मालकी हक्क व स्थलांतराबाबत आगाऊ माहिती देण्यात येईल, कामगारांशी चर्चा करून प्रश्न सोडविले जातील आदी मागण्या मान्य केल्या. तहसीलदार डाॅ. उद्धव कदम, कामगार आयुक्त किशोर दहिफळकर, सहायक कामगार आयुक्त संकेत कानडे, पोलीस निरीक्षक सुधीर संखे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, प्रशांत पाटील, कंपनी मॅनेजर संतोष देशमुख यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर लेखी आश्वासन देण्यात आले. मयूर लबडे, रुपेश पाटील, नवनाथ मोर, भक्तिदास भोईर, दीक्षा पाटील आदी उपोषणास बसले होते. व्यवस्थापनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.