शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

हिंदू-मुस्लिम साथ साथ चलेगा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:54 IST

पालघरमध्ये शांततेत मोर्चा : नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध

हितेन नाईक

पालघर : ‘एकता का राज चलेगा, हिंदू-मुस्लिम साथ साथ चलेगा’ असे फलक झळकावीत राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या हजारो नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध, शांतपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मूकमोर्चा काढून या कायद्याला आपला विरोध दर्शविला.

पालघर येथील छत्रपती शिवाजी चौकपासून सकाळी ११ वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा बहुजन समाज अध्यक्ष हाजी साजिद शेख, माजी उपनगराध्यक्ष रईस खान, भूमिसेना अध्यक्ष काळूराम धोदडे, शशी सोनवणे, काँग्रेसचे सिकंदर शेख, समी पिरा, वंचित बहुजन आघाडीचे गणेश प्रधान, दलित पँथरचे आतिष राऊत, सीपीएमचे बारक्या मांगात, राष्ट्रवादीचे सचिन पाटील, बशीर शेख, आरपीआय आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यासह महिलांचा मोठा सहभाग असलेल्या हजारोंच्या संख्येने लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते.नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या कायद्यात केलेली दुरुस्ती ही अन्यायकारक व घटनाविरोधी आहे. नागरिकत्व कायद्यात झालेल्या सुधारणेमध्ये धर्माच्या आधारावर देण्यात येणारे नागरिकत्व हे संविधानाच्या कलम १४ व २१ चे उल्लंघन असून भारतीय संविधान कोणत्याही धर्म व्यवस्थेवर आधारित नसून धर्मनिरपेक्ष लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय व्यवस्थेवर आधारित आहे. परंतु संविधानातील धर्मनिरपेक्ष व्यवस्थेतील मूळ संविधानिक ढाचा नष्ट करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार या कायद्याच्या माध्यमातून करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संविधानातील मूळ राष्ट्रीय नागरिकत्व कायदा म्हणजे मूळ निवासी बहुजन समाजावर व धर्मनिरपेक्ष लोकशाही संविधानावर आघात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.संविधान व लोकशाही व्यवस्थेची पायमल्लीदुरुस्तीच्या नावाने धार्मिक आधार दुरुस्त करण्यात आला असूनही संविधान व लोकशाही व्यवस्थेची ही पायमल्ली आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गौरव मिळवून देणाºया संविधानाची पायमल्ली होत असल्याची भावना या वेळी मोर्चेकऱ्यांनी भाषणातून व्यक्त केली. या वेळी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विधेयक व सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायदा त्वरित रद्द करण्यात येऊन देशात कायदा-सुव्यवस्था व शांतता कायम राहावी, असे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली३० पोलीस अधिकारी, २६० महिला व पोलीस कर्मचारी, १ एस.आर.पी. पथक असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार