शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

हिंदू-मुस्लिम साथ साथ चलेगा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:54 IST

पालघरमध्ये शांततेत मोर्चा : नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध

हितेन नाईक

पालघर : ‘एकता का राज चलेगा, हिंदू-मुस्लिम साथ साथ चलेगा’ असे फलक झळकावीत राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या हजारो नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध, शांतपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मूकमोर्चा काढून या कायद्याला आपला विरोध दर्शविला.

पालघर येथील छत्रपती शिवाजी चौकपासून सकाळी ११ वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा बहुजन समाज अध्यक्ष हाजी साजिद शेख, माजी उपनगराध्यक्ष रईस खान, भूमिसेना अध्यक्ष काळूराम धोदडे, शशी सोनवणे, काँग्रेसचे सिकंदर शेख, समी पिरा, वंचित बहुजन आघाडीचे गणेश प्रधान, दलित पँथरचे आतिष राऊत, सीपीएमचे बारक्या मांगात, राष्ट्रवादीचे सचिन पाटील, बशीर शेख, आरपीआय आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यासह महिलांचा मोठा सहभाग असलेल्या हजारोंच्या संख्येने लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते.नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या कायद्यात केलेली दुरुस्ती ही अन्यायकारक व घटनाविरोधी आहे. नागरिकत्व कायद्यात झालेल्या सुधारणेमध्ये धर्माच्या आधारावर देण्यात येणारे नागरिकत्व हे संविधानाच्या कलम १४ व २१ चे उल्लंघन असून भारतीय संविधान कोणत्याही धर्म व्यवस्थेवर आधारित नसून धर्मनिरपेक्ष लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय व्यवस्थेवर आधारित आहे. परंतु संविधानातील धर्मनिरपेक्ष व्यवस्थेतील मूळ संविधानिक ढाचा नष्ट करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार या कायद्याच्या माध्यमातून करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संविधानातील मूळ राष्ट्रीय नागरिकत्व कायदा म्हणजे मूळ निवासी बहुजन समाजावर व धर्मनिरपेक्ष लोकशाही संविधानावर आघात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.संविधान व लोकशाही व्यवस्थेची पायमल्लीदुरुस्तीच्या नावाने धार्मिक आधार दुरुस्त करण्यात आला असूनही संविधान व लोकशाही व्यवस्थेची ही पायमल्ली आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गौरव मिळवून देणाºया संविधानाची पायमल्ली होत असल्याची भावना या वेळी मोर्चेकऱ्यांनी भाषणातून व्यक्त केली. या वेळी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विधेयक व सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायदा त्वरित रद्द करण्यात येऊन देशात कायदा-सुव्यवस्था व शांतता कायम राहावी, असे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली३० पोलीस अधिकारी, २६० महिला व पोलीस कर्मचारी, १ एस.आर.पी. पथक असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार