शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हिंदू अल्पसंख्य होतील !

By admin | Updated: March 30, 2016 01:16 IST

देशात हिंदुंची संख्या घटत असून ते विखुरले आहेत ही परिस्थिती ओळखून ते संघटीत न झाल्यास शंभर वर्षानंतर भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष

बोईसर : देशात हिंदुंची संख्या घटत असून ते विखुरले आहेत ही परिस्थिती ओळखून ते संघटीत न झाल्यास शंभर वर्षानंतर भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी येथे दिला.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पालघर जिल्हा शाखेतर्फे बोईसर येथे विशाल हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र महाराज यांच्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले संत तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह हजारो हिंदू उपस्थित होते.डॉ. तोगडिया यांनी हिंदू शिक्षित व समृद्ध झाला पाहिजे, त्याचप्रमाणे हिंदू मध्ये जागृती होऊन ते सक्रीय होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तोगडिया यांनी हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसीडी, दिल्ली येथील डॉ. नारंग यांची हिंदू एरीयात झालेली हत्या, मुस्लीम समाजाला देण्यात येणाऱ्या सोयी व सवलती इ. विषयावर प्रखर टीका केलीे.भारतात हिंदु हेच बहुसंख्य राहीले पाहिजेत ती काळाची गरज असून हिंदूच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी सहा मुद्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन सांगितला व जागरूक हिंदू बनण्याचे आवाहन केले अनेक मुद्दे त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेऊन आता यानंतर हिंदुंची संख्या घटणार नसून वाढेल असा आशावाद व्यक्त करून भारत हिंदू राष्ट्र है, और रहेगा ये हमारा नारा है, असे सांगितले.नरेंद्र महाराजांनी हिंदु बांधवांनी धर्म, संस्कृती वाचविण्यासाठी स्वाभिमान बाळगून संघटीत झाले पाहिजे, मनशांतीसाठी धर्म जगवणे गरजेचे आहे.आपली संस्कृती टिकवणे आवश्यक असून संस्कारशिवाय जीवनाला अर्थ नसल्याचे सांगितले तर अंधश्रद्धेचे ताडन केले जाते. काही एनजीओंना बाहेरून पैसा पुरवून हिंदु तरूण नास्तीक कसे होतील अशी कारस्थाने केली जातात. जेथे संस्कार विसरले जातात तेथे संस्कृती लयाला जाते असे सांगितले. त्यांनी संस्कारातून निर्माण झालेला सनातन हिंदू धर्म टिकविण्याचे आवाहन केले.