शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

वाड्यात सीएनजी पंप नसल्याने हेलपाटा; वाहनचालकांना जावे लागते भिवंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 00:17 IST

भिवंडी येथे जाताना शेलार येथे दररोज वाहतूक कोंडी होते. आधी या कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो

वाडा : वाडा तालुक्यात सीएनजी गॅस पंप नसल्याने तालुक्यातील शेकडो वाहनचालकांना गाडीमध्ये सीएनजी भरायला ३० किलोमीटर अंतर कापून भिवंडी येथे जावे लागते. यामुळे वाहनचालकांचे आर्थिक नुकसान, तसेच वेळेचा प्रचंड अपव्यय होत असल्याने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

वाडा तालुक्यात सीएनजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. सरकारने काही गाड्या सक्तीने सीएनजीवर केल्या आहेत. मात्र, तालुक्यात सीएनजी पंपच नसल्याने या गाड्यांमध्ये सीएनजी भरण्यासाठी भिवंडी येथे जावे लागत आहे. भिवंडीशिवाय दुसरा जवळपास कुठेही सीएनजी पंप नसल्याने वाहनचालक-मालकांची प्रचंड गैरसोय होते. ३० ते ४० किलोमीटर अंतरावर भिवंडी शहर असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे, तसेच भिवंडीत पोहोचेपर्यंत दीड ते दोन तास या प्रवासात जात असल्याने वेळेचाही अपव्यय होत असल्याचे चालकांनी सांगितले.

भिवंडी येथे जाताना शेलार येथे दररोज वाहतूक कोंडी होते. आधी या कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो. त्यानंतर सीएनजी पंपावरही रांग लावावी लागते. या सगळ्यांमध्ये त्यांचा तासाभराचा वेळ वाया जातो. त्यामुळे चालक हैराण होत आहेत. त्यातच भिवंडी-वाडा महामार्गाची दुरवस्था झाली असून, यामुळे वाहनांचे नुकसानही होते. तालुक्यातील कुडूस-अंबाडी, कुडूस-कोंढले, कुडूस-उचाट, कुडूस-देवघर, कुडूस-नारे-वडवली, कुडूस-वाडा, कुडूस-खानिवली, वाडा-विक्रमगड, वाडा-परळी, खानिवली-कंचाड-गोऱ्हे, अंबाडी-चांबळे, लोहपे, अकलोली, केळठण, गणेशपुरी-निबवली-गोऱ्हाड, खानिवली-पालसई-असनस कंळभई, वाडा-सोनाळे-कळंभे आदी मार्गांवर सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या प्रवाशांची वाहतूक करतात. सीएनजी भरल्यानंतर दोन-तीन दिवस पुरतो, त्यानंतर पुन्हा सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. बाहेरचे भाडे घेतले तर एका दिवसातही सीएनजी संपतो, असे चालक म्हणतात. त्यामुळे तालुक्यातील मेट, कुडूस, खुपरी, वाडा, पाली, या ठिकाणी डिझेल व पेट्रोलपंप आहेत. या ठिकाणी सीएनजी पंपाला शासनाने परवानगी द्यावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

सीएनजी गॅसची सोय वाड्यात नसल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर सीएनजी पंप तालुक्यात सुरू करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करून प्रशासन व सरकारचे लक्ष वेधावे लागेल.- शुभम गायकर, वाहनमालक

सीएनजी पंप वाडा तालुक्यात किंवा अंबाडी परिसरात नसल्याने आम्हा रिक्षावाल्यांची गैरसोय होत आहे. सीएनजी भरायला आम्हाला पहाटे पाच वाजता उठून भिवंडी गाठावे लागते. तेव्हाही रांगा लागलेल्या असतात. पंपावर वीज नसल्यास किंवा गॅस नसल्यास तासन्तास वाट पाहावी लागते. यामध्ये आमचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच वेळेचाही अपव्यय होतो. यासाठी शासनाने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करावा.- संदीप भोईर, रिक्षा मालक

टॅग्स :carकार