शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
2
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
3
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
5
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
6
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
7
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
8
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
9
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
10
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
11
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
12
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
13
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
14
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
15
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
16
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
17
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
18
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
19
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
20
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

वाड्यात सीएनजी पंप नसल्याने हेलपाटा; वाहनचालकांना जावे लागते भिवंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 00:17 IST

भिवंडी येथे जाताना शेलार येथे दररोज वाहतूक कोंडी होते. आधी या कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो

वाडा : वाडा तालुक्यात सीएनजी गॅस पंप नसल्याने तालुक्यातील शेकडो वाहनचालकांना गाडीमध्ये सीएनजी भरायला ३० किलोमीटर अंतर कापून भिवंडी येथे जावे लागते. यामुळे वाहनचालकांचे आर्थिक नुकसान, तसेच वेळेचा प्रचंड अपव्यय होत असल्याने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

वाडा तालुक्यात सीएनजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. सरकारने काही गाड्या सक्तीने सीएनजीवर केल्या आहेत. मात्र, तालुक्यात सीएनजी पंपच नसल्याने या गाड्यांमध्ये सीएनजी भरण्यासाठी भिवंडी येथे जावे लागत आहे. भिवंडीशिवाय दुसरा जवळपास कुठेही सीएनजी पंप नसल्याने वाहनचालक-मालकांची प्रचंड गैरसोय होते. ३० ते ४० किलोमीटर अंतरावर भिवंडी शहर असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे, तसेच भिवंडीत पोहोचेपर्यंत दीड ते दोन तास या प्रवासात जात असल्याने वेळेचाही अपव्यय होत असल्याचे चालकांनी सांगितले.

भिवंडी येथे जाताना शेलार येथे दररोज वाहतूक कोंडी होते. आधी या कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो. त्यानंतर सीएनजी पंपावरही रांग लावावी लागते. या सगळ्यांमध्ये त्यांचा तासाभराचा वेळ वाया जातो. त्यामुळे चालक हैराण होत आहेत. त्यातच भिवंडी-वाडा महामार्गाची दुरवस्था झाली असून, यामुळे वाहनांचे नुकसानही होते. तालुक्यातील कुडूस-अंबाडी, कुडूस-कोंढले, कुडूस-उचाट, कुडूस-देवघर, कुडूस-नारे-वडवली, कुडूस-वाडा, कुडूस-खानिवली, वाडा-विक्रमगड, वाडा-परळी, खानिवली-कंचाड-गोऱ्हे, अंबाडी-चांबळे, लोहपे, अकलोली, केळठण, गणेशपुरी-निबवली-गोऱ्हाड, खानिवली-पालसई-असनस कंळभई, वाडा-सोनाळे-कळंभे आदी मार्गांवर सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या प्रवाशांची वाहतूक करतात. सीएनजी भरल्यानंतर दोन-तीन दिवस पुरतो, त्यानंतर पुन्हा सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. बाहेरचे भाडे घेतले तर एका दिवसातही सीएनजी संपतो, असे चालक म्हणतात. त्यामुळे तालुक्यातील मेट, कुडूस, खुपरी, वाडा, पाली, या ठिकाणी डिझेल व पेट्रोलपंप आहेत. या ठिकाणी सीएनजी पंपाला शासनाने परवानगी द्यावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

सीएनजी गॅसची सोय वाड्यात नसल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर सीएनजी पंप तालुक्यात सुरू करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करून प्रशासन व सरकारचे लक्ष वेधावे लागेल.- शुभम गायकर, वाहनमालक

सीएनजी पंप वाडा तालुक्यात किंवा अंबाडी परिसरात नसल्याने आम्हा रिक्षावाल्यांची गैरसोय होत आहे. सीएनजी भरायला आम्हाला पहाटे पाच वाजता उठून भिवंडी गाठावे लागते. तेव्हाही रांगा लागलेल्या असतात. पंपावर वीज नसल्यास किंवा गॅस नसल्यास तासन्तास वाट पाहावी लागते. यामध्ये आमचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच वेळेचाही अपव्यय होतो. यासाठी शासनाने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करावा.- संदीप भोईर, रिक्षा मालक

टॅग्स :carकार