शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मेघगर्जनेसह वाड्यात जोरदार पावसाच्या सरी; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 08:10 IST

पालघर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी : भातपीक वाया जाण्याची भीती; बाेटींना किनाऱ्यावर परतण्याचे आदेश

पालघर :  मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे. समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा देण्यात आला असला तरी जिल्ह्यातील शेकडो बोटी समुद्रात उभ्या आहेत.  समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे १६ ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये,असा इशारा दिला आहे. जे मच्छीमार समुद्रामध्ये आहेत, त्यांनी आपल्या बंदरांमध्ये सुरक्षित ठिकाणी यावे, असा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवडाभरापासून  झाई ते वसई दरम्यानच्या किनारपट्टीवर शेकडो बोटी समुद्रात उभ्या आहेत.  सहकारी संस्थांमधून त्यांना माघारी परत येण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेचे एमडी पंकज म्हात्रे यांनी  सांगितले.  

मेघगर्जनेसह वाडय़ात मंगळवार संध्याकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारीही संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतक:यांनी शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  भाताचे पीक तयार होऊन त्याची कापणी सुरू झाली आहे. मात्र, अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात कापून ठेवलेले पीक भिजले आहे. शेतात पाणी साचल्याने शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाताचे दाणो शेतातच गळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर मजूरटंचाई, वाढलेले मजुरीचे दर अशा अनेक संकटांवर मात करून मोठय़ा हिमतीने भातपिकाची लागवड केली. त्यानंतर, समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही जोमात आले. नेमके कापणीच्या वेळी पावसाचे संकट उभे ठाकल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तयार पिकाला पाणी लागले, तर तांदूळ दाण्याच्या गुणवत्तेत फरक पडतो. तसेच कडबादेखील जनावरांना खाण्यालायक राहत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीवर केलेला खर्च कसा भरून काढायचा, या चिंतेत ते सापडलेत.

टॅग्स :Rainपाऊस