शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

मेघगर्जनेसह वाड्यात जोरदार पावसाच्या सरी; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 08:10 IST

पालघर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी : भातपीक वाया जाण्याची भीती; बाेटींना किनाऱ्यावर परतण्याचे आदेश

पालघर :  मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे. समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा देण्यात आला असला तरी जिल्ह्यातील शेकडो बोटी समुद्रात उभ्या आहेत.  समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे १६ ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये,असा इशारा दिला आहे. जे मच्छीमार समुद्रामध्ये आहेत, त्यांनी आपल्या बंदरांमध्ये सुरक्षित ठिकाणी यावे, असा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवडाभरापासून  झाई ते वसई दरम्यानच्या किनारपट्टीवर शेकडो बोटी समुद्रात उभ्या आहेत.  सहकारी संस्थांमधून त्यांना माघारी परत येण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेचे एमडी पंकज म्हात्रे यांनी  सांगितले.  

मेघगर्जनेसह वाडय़ात मंगळवार संध्याकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारीही संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतक:यांनी शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  भाताचे पीक तयार होऊन त्याची कापणी सुरू झाली आहे. मात्र, अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात कापून ठेवलेले पीक भिजले आहे. शेतात पाणी साचल्याने शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाताचे दाणो शेतातच गळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर मजूरटंचाई, वाढलेले मजुरीचे दर अशा अनेक संकटांवर मात करून मोठय़ा हिमतीने भातपिकाची लागवड केली. त्यानंतर, समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही जोमात आले. नेमके कापणीच्या वेळी पावसाचे संकट उभे ठाकल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तयार पिकाला पाणी लागले, तर तांदूळ दाण्याच्या गुणवत्तेत फरक पडतो. तसेच कडबादेखील जनावरांना खाण्यालायक राहत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीवर केलेला खर्च कसा भरून काढायचा, या चिंतेत ते सापडलेत.

टॅग्स :Rainपाऊस