शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

मेघगर्जनेसह वाड्यात जोरदार पावसाच्या सरी; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 08:10 IST

पालघर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी : भातपीक वाया जाण्याची भीती; बाेटींना किनाऱ्यावर परतण्याचे आदेश

पालघर :  मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे. समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा देण्यात आला असला तरी जिल्ह्यातील शेकडो बोटी समुद्रात उभ्या आहेत.  समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे १६ ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये,असा इशारा दिला आहे. जे मच्छीमार समुद्रामध्ये आहेत, त्यांनी आपल्या बंदरांमध्ये सुरक्षित ठिकाणी यावे, असा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवडाभरापासून  झाई ते वसई दरम्यानच्या किनारपट्टीवर शेकडो बोटी समुद्रात उभ्या आहेत.  सहकारी संस्थांमधून त्यांना माघारी परत येण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेचे एमडी पंकज म्हात्रे यांनी  सांगितले.  

मेघगर्जनेसह वाडय़ात मंगळवार संध्याकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारीही संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतक:यांनी शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  भाताचे पीक तयार होऊन त्याची कापणी सुरू झाली आहे. मात्र, अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात कापून ठेवलेले पीक भिजले आहे. शेतात पाणी साचल्याने शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाताचे दाणो शेतातच गळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर मजूरटंचाई, वाढलेले मजुरीचे दर अशा अनेक संकटांवर मात करून मोठय़ा हिमतीने भातपिकाची लागवड केली. त्यानंतर, समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही जोमात आले. नेमके कापणीच्या वेळी पावसाचे संकट उभे ठाकल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तयार पिकाला पाणी लागले, तर तांदूळ दाण्याच्या गुणवत्तेत फरक पडतो. तसेच कडबादेखील जनावरांना खाण्यालायक राहत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीवर केलेला खर्च कसा भरून काढायचा, या चिंतेत ते सापडलेत.

टॅग्स :Rainपाऊस