शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

तरुणांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते हृद्य सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:41 IST

येथे शनिवारी घडलेल्या बोटदुर्घटनेमध्ये समुद्रात बुडणाºया २५ विद्यार्थ्यांचा जीव आपल्या प्राणाची बाजी लावून वाचविणा-या व त्यांना किना-यापर्यंत सुखरुप

डहाणू : येथे शनिवारी घडलेल्या बोटदुर्घटनेमध्ये समुद्रात बुडणाºया २५ विद्यार्थ्यांचा जीव आपल्या प्राणाची बाजी लावून वाचविणा-या व त्यांना किना-यापर्यंत सुखरुप आणणा-या डहाणूतील ३५ मच्छीमार युवकांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते येथील प्रांत कार्यालयात करण्यात आला. यावेळी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले गेले. त्यात नंदकुमार विंदे, गणेश मर्दे, जयकिसन तामोरे, पवन गणेश धानमेहेर, साईराज पागधरे, जतीन मांगेला रा. डहाणू मंगेलवाडा, आणि भाविक दवणे, स्वप्नील विंदे, चंदन मेहेर, धनेश आकरे, गणेश पागधरे, सुधीर खाकरे संजय वेडगा, विनोद वेडगा, सत्तार , मनिष सालकर, शापूर सालकर, विजय दुबा, सलिम शेख व इतरांचा समावेश होता.पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, डहाणू नगर परिषद, रोटरी क्लब आॅफ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा शाल, पु्ष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गेला. यावेळी डहाणूवर ओढावलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करतांना डहाणूकरांनी दाखवलेली एकजुट कौतुकास पात्र असून यापुढेही आपतकालीन परिस्थितीचा सामना करतांना ते ती टिकवून ठेवतील असे गौरवोद्गार जिल्हाधिकाºयांनी काढले. यावेळी सहा. जिल्हाधिकारी आँचल गोयल, नगराध्यक्ष भरत राजपूत, तहसीलदार राहुल सारंग, मुख्याधिकारी विनोड डवले, उपस्थित होते. यावेळी ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष मर्दे यांनी या दुर्घटनेत बोटचालक आणि त्यांच्या साथीदाराने बोटीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे जीव वाचवले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांचा सहानुभूतीने विचार करावा असे आवाहन केले. स्थानिक मच्छीमार, तटरक्षक दल, डहाणू नगर परिषद, तहसिलदार, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांचे आभार मानले.