शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते हृद्य सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:41 IST

येथे शनिवारी घडलेल्या बोटदुर्घटनेमध्ये समुद्रात बुडणाºया २५ विद्यार्थ्यांचा जीव आपल्या प्राणाची बाजी लावून वाचविणा-या व त्यांना किना-यापर्यंत सुखरुप

डहाणू : येथे शनिवारी घडलेल्या बोटदुर्घटनेमध्ये समुद्रात बुडणाºया २५ विद्यार्थ्यांचा जीव आपल्या प्राणाची बाजी लावून वाचविणा-या व त्यांना किना-यापर्यंत सुखरुप आणणा-या डहाणूतील ३५ मच्छीमार युवकांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते येथील प्रांत कार्यालयात करण्यात आला. यावेळी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले गेले. त्यात नंदकुमार विंदे, गणेश मर्दे, जयकिसन तामोरे, पवन गणेश धानमेहेर, साईराज पागधरे, जतीन मांगेला रा. डहाणू मंगेलवाडा, आणि भाविक दवणे, स्वप्नील विंदे, चंदन मेहेर, धनेश आकरे, गणेश पागधरे, सुधीर खाकरे संजय वेडगा, विनोद वेडगा, सत्तार , मनिष सालकर, शापूर सालकर, विजय दुबा, सलिम शेख व इतरांचा समावेश होता.पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, डहाणू नगर परिषद, रोटरी क्लब आॅफ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा शाल, पु्ष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गेला. यावेळी डहाणूवर ओढावलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करतांना डहाणूकरांनी दाखवलेली एकजुट कौतुकास पात्र असून यापुढेही आपतकालीन परिस्थितीचा सामना करतांना ते ती टिकवून ठेवतील असे गौरवोद्गार जिल्हाधिकाºयांनी काढले. यावेळी सहा. जिल्हाधिकारी आँचल गोयल, नगराध्यक्ष भरत राजपूत, तहसीलदार राहुल सारंग, मुख्याधिकारी विनोड डवले, उपस्थित होते. यावेळी ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष मर्दे यांनी या दुर्घटनेत बोटचालक आणि त्यांच्या साथीदाराने बोटीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे जीव वाचवले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांचा सहानुभूतीने विचार करावा असे आवाहन केले. स्थानिक मच्छीमार, तटरक्षक दल, डहाणू नगर परिषद, तहसिलदार, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांचे आभार मानले.