शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

विरार-डहाणू चौपदरीकरणावर उच्च न्यायालयात शनिवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:31 IST

विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात रेल्वेकडून होणारी अक्षम्य दिरंगाई आणि हे काम तात्काळ मार्गी लागावे, यासाठी गतवर्षी आॅगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची लवकरच २४ नोव्हेंबरला होणार आहे.

वसई : विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात रेल्वेकडून होणारी अक्षम्य दिरंगाई आणि हे काम तात्काळ मार्गी लागावे, यासाठी गतवर्षी आॅगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची लवकरच २४ नोव्हेंबरला होणार आहे.चर्चगेट-डहाणूदरम्यान लोकल सेवा सुरु झाली. प्रवाशांची संख्या लक्षात घेता लोकलच्या सेवा वाढवणे आवश्यक आहे. मात्र विरार-डहाणू चौपदरीकरण होत नाही, तोपर्यंत लोकल सेवा वाढण्याची शक्यता कमी आहे. सध्या विरार ते डहाणू परिसरात राहणारे चाकरमानी, विद्यार्थी, शेतकरी व्यापारी, शिक्षक, शेतकऱ्यांना दररोज प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यातच दोन पदरी मार्गावर लांब पल्ल्यांच्या मेल आणि मालवाहू गाड्यांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी लोकल गाड्यांना थांबवून ठेवण्यात येते. म्हणूनच या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी चोरघे यांनी मुंबई उच्च न्यायालयात गतवर्षी जनिहत याचिका दाखल केली होती. पालघर जिल्ह्याला खºया अर्थाने चालना द्यावयाची असल्यास विरार डहाणू चौपदरीकरण होऊन लोकल गाड्यांची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.माहिती अधिकारात बाब उघडपश्चिम रेल्वेद्वारे विरार-डहाणू लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचे सध्या नियोजन करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरु वात करण्यात आलेली नाही, अशी महत्वपूर्ण माहिती आरटीआय कार्यकर्त्याला रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.रेल्वेच्या दिरंगाईमुळेच जनहित याचिकाचौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असले तरी त्याला अद्याप मंजूरी मिळालेली नाही. ती नसल्याने त्यासाठी निधीची तरतूदही केली नाही. ती कधी होणार याची निश्चिती नाही. या कामासाठी येणाºया खर्चाचा भार रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. असे असले तरी कामाच्या शुभारंभाची निश्चिती नाहीच. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकाकर्ते राजकुमार चोरघे यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय