शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बिलाचा आकडा ऐकून रुग्णाने ठोकली रुग्णालयातून धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:40 IST

विरारमधील घटना : विजय वल्लभ रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. अशातच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नाहीत म्हणून काही नागरिक खाजगी रुग्णालयांकडे उपचारासाठी वळतात, मात्र काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले लावून रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याने रुग्णांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाने कोरोनाग्रस्त रुग्णालादीड लाखांचे बिल आकारल्याने बिलाचा आकडा ऐकूनच रुग्णाने रुग्णालयातून धूम ठोकल्याचा प्रकार घडला आहे.विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रु ग्णालयात १२ जुलै रोजी एक कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झाला होता. पाच-सहा दिवस उपचारांनंतर रु ग्णाची तब्येत सुधारल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्याचे ठरले. या वेळी ५-६ दिवसांच्या उपचाराचे बिल दीड लाखाच्या घरात आल्याचे समजताच रुग्णाने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी बोलायचे आहे, सांगत रुग्णालयातूनच पळ काढला. डॉक्टरांनी या रुग्णाला फोन केल्यानंतर मी सर्वांना बाधित करेन, अशी धमकी रुग्णाने डॉक्टरांना दिली आहे.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या रु ग्णाचा शोध सुरू आहे. या आधीही महाराष्ट्रात अनेक रु ग्ण उपचारादरम्यान हॉस्पिटलमधून पळून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे वसई-विरारमध्ये सलग चार महिन्यांपासून कोरोनामुळे असलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. हातचे रोजगार, कामधंदा ठप्प असल्याने रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यमवर्गीय नागरिकांसमोर तर इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.वसई-विरारमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये चांगले उपचार होणार नाहीत, या भीतीपोटी अनेक लोक खाजगी रुग्णालयांना पसंती देतात, मात्र कोरोनावर खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाºया सर्वसामान्य मध्यमवर्गीय रुग्णांची अवस्था बिकट झालेली आहे. कोरोनासारख्या आजारावर रुग्णालये आकारत असलेली अव्वाच्या सव्वा बिले हा संतापाचा विषय ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी लाखो रुपये आणायचे कोठून? असा सवाल नागरिकांकडून सातत्याने विचारला जात आहे.