शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी रज:काल सप्ताह

By admin | Updated: May 29, 2017 05:36 IST

जागतिक रज:काल दिनानिमित्ताने वसई विरार महापालिका आणि स्टेप अप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वसईत २८ मे ते ४ जून

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : जागतिक रज:काल दिनानिमित्ताने वसई विरार महापालिका आणि स्टेप अप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वसईत २८ मे ते ४ जून दरम्यान निरोगी रज:काल स्वास्थ नियोजन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याकाळात मासिक पाळीतील स्वच्छतेवर जनजागृती करण्यात येणार आहे. निरोगी रज:काल स्वास्थ नियोजन हा विषय परदेशात अतिशय खुलेपणाने चर्चिला जात असला तरी आपल्या देशात व राज्यात याविषयी मोकळेपणाने चर्चा होत नाही. उलट याविषयी अनेक अंधश्रद्धा, गैरसमज व अनिष्ट चालीरीती आजही पाळल्या जात आहेत. स्टेपअप फाऊंडेशन या वसईतील सेवाभावी संस्थेने याविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन अनेक उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती, संस्थेच्या संचालिका यती राऊत आणि स्वरुपा शिर्सेकर यांनी दिली. मासिक पाळी म्हणजे मातृत्वाची क्षमता प्राप्त झाल्याची पूर्व सूचना असते. त्याबाबत स्त्रीयांमध्ये जागृती करण्यासाठी संस्थेने महापालिकेच्या मदतीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात महिला बचत गट, एएनएम, वैद्यकीय अधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. वस्ती पाड्यावर जाऊन किशोरवयीन मुलींची यादी तयार केली जाणार आहे. पाळी दरम्यान कापडाऐवजी सॅनिटरी नॅपकीनचा वापर व त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया समजावून दिली जाणार आहे. सरकारी दवाखाने, हॉस्पीटल, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मेडिकल हेल्थ पोस्टच्या माध्यमातून निरोगी रजो:कालासंबंधी महिलांमध्ये जागृती केली जाणार आहे. अंगणवाडी, बचत गटामार्फत रॅली काढून प्रबोधन करणे, पथनाट्याच्या माध्यमातून माहिती देणे, शाळांमध्ये आॅडिओ, चलचित्रपटांद्वारे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे आदी उपक्रम सप्ताहात राबवले जाणार आहेत. स्टेपअप फाऊंडेशन महापालिका हद्दीत सॅनिटरी व्हेंडींग मशिन लावण्यात येणार आहे. तसेच वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स जाळून त्याची काही सेकंदात राख करणाऱ्या इर्न्सनेटर या यंत्राची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका टाळून घन कचरा व्यवस्थापनेत येणारे अडथळे दूर केले जाऊ शकतात याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला होईल, असे यती राऊत आणि स्वरुपी शिर्सेकर यांनी सांगितले. या उपक्रमाला महिलांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.सॅनिटरी नॅपकीनवरील कर रद्द झाला पाहिजेपालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये आजही एकच चिंधी चार दिवस वापरली जाते. तर आदिवासी अज्ञानापोटी कोंडा वापरतात. थोडयाफार फरकाने राज्यातील लाखो गरीब महिला हीच पद्धत अवलंबत असतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येत असते. असे असताना सॅनिटरी नॅपकीन मोफत वा स्वस्तात उपलब्ध करून देण्याऐवजी सरकारने त्यावर त्यावर जबर कर लादला असून त्यात दरवर्षी वाढही केली जात आहे. त्यामुळे महागडे सॅनिटरी नॅपकीन वापरण्याऐवजी घातक मार्ग शोधले जात आहेत, याकडे यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यात आले.