शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय वसईत व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:24 IST

विवेक पंडित, मनवेल तुस्कानो यांची सूचना : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

वसई : राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे वसई-विरार, मीरा-भाईंदर आयुक्तालय. या नव्या पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय वसई तालुक्यातच असावे, अशी महत्त्वाची सूचना आ. विवेक पंडित यांच्यासहित वसईच्या पश्चिम पट्ट्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते मनवेल तुस्कानो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अर्थातच, या संदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार असल्याने या दोन्ही नेत्यांचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

आ. विवेक पंडित यांनी राज्य शासनाने घेतलेल्या वसई-विरार, मीरा-भार्इंदर या नव्या प्रस्तावित आयुक्तालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या नव्या आयुक्तालयाचे मुख्यालय निश्चित करताना वसई तालुक्यात ते गठीत करणे अधिक संयुक्तिक ठरेल, अशी पंडित यांची सूचना आहे.

वसई तालुक्याची लोकसंख्या मिरा-भाईंदर शहरापेक्षा नक्कीच जास्त असून गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि चालू काळातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता या भागात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. तर वसई-विरार भागात १९९५ नंतर घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल आजपर्यंत झालेली नाही. याउलट गुन्हा झाला असतानाही गुन्हा कोणी व का केला ही बाब अद्यापही निष्पन्न होत नसल्याने पोलीस यंत्रणांनी गुन्ह्यांची प्रकरणेच चक्क दप्तरबंद केल्याचे पंडित यांचे म्हणणे आहे. एकूणच सरकारने उशीरा का होईना पण एक उत्तम असा निर्णय घेतला. त्यामुळे नव्या पोलीस आयुक्तालयाबद्दल जनसामान्यात विश्वासार्हता निर्माण होऊ शकेल, असे पंडित यांनी सांगितले. तर ज्येष्ठ समाजवादी नेते मनवेल तुस्कानो यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

वसई-विरारच्या गुन्हेगारीचा चढता आलेख !वसई-विरार भागात विविध प्रकारातील गुन्हेगारांची संख्या मोठी असून येथे घडत असलेल्या गुन्ह्यांचा आलेख चढता आहे. तुलनात्मकरित्या मीरा-भार्इंदर शहरात गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र या सर्व कारणास्तव वसई-विरार, मीरा-भार्इंदर या दोन प्रगत व जोड शहरांच्या नव्या प्रस्तावित पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय वसईतच निर्माण करणे उचित ठरेल असेही विवेक पंडित यांनी शेवटी म्हटले आहे.त्यातच ज्येष्ठ समाजवादी नेते तथा गुन्हेगारांच्या विरोधात नेहमीच लोकशाही मार्गे प्रतिकार करण्यासाठी उभे राहण्याचे बळ देणारे मनवेल तुस्कानो हे २५ वर्षांपासून सागरी आयुक्तालय गठीत करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करीत आले आहेत.

त्यामुळे सागरी सुरक्षितता लक्षात घेऊन भार्इंदरमधील उत्तन राई ते पालघर जिल्ह्याच्या गुजरात सीमेवरील झाई बंदर भागापर्यंत सागरी पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यात यावे, अशी त्यांची सातत्यपूर्ण मागणी राहिली आहे. या मागणीसाठी त्यांनी दीर्घकाळाने आंदोलने केली आणि शासनाकडे नियमितपणे शेकडोवेळा पत्रव्यवहारही केला आहे. वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांसाठी नव्या पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीचा राज्य शासनाने निर्णय घेतल्याने मागणीला न्याय मिळाल्याचे तुस्कानो म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस