शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजनांमधील त्रुटींमुळे डोकेदुखी

By admin | Updated: June 3, 2017 06:08 IST

तारापुर अणुऊर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणी करीता शेतजमीनी आणि घरे दिलेल्या पोफरण व अक्करपट्टी या दोन गावातील

पंकज राऊज/ लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापुर अणुऊर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणी करीता शेतजमीनी आणि घरे दिलेल्या पोफरण व अक्करपट्टी या दोन गावातील प्रकल्प ग्रस्तांच्या घरांचे निकृष्ठ बांधकाम व त्यांचा रोजगार व व्यवसायाचे सर्वेक्षण करण्यासंबंधी न्यायमूर्ती अभय ओक यांनी दिलेल्या आदेशानंतर सुरू केलेल्या सर्वेक्षणात पुनर्वसनातील अनेक गंभीर त्रूटी समोर आल्याने प्रकल्पग्रस्तांनच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे. या त्रुटी दूर करून न्याय देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तानच्या प्रतिनिधिनी केली आहेजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार ३० मे पासून दोन्ही गावात सर्वेला सुरु वात झाली मात्र, पहाणीच्या तिसऱ्याच दिवशी पुनर्वसनात झालेल्या त्रुटी प्रखरतेने दिसून आल्याचे पोफरण कृती समितीचे माजी अध्यक्ष विजय तामोरे यांनी लोकमतला सांगितले. त्यात घराचा भूखंड मिळाला परंतू त्याचा ७/१२ तयार न झाल्यामुळे घरमालकास ताबा दिलेला असूनही त्यांच्या घराच्या भूखंडाचे सर्व्हे केला जात नाही, तर काही घराच्या भूखंडाच्या क्षेत्रात एम.एस.ई. डी.चे खांब व काही ठिकाणी घराच्या दर्शनी भागात ट्रान्सफार्मर उभे केले असल्यामुळे आणि त्यांना बळजबरीने घराचा ताबा दिल्याने त्या घरात राहता येत नसून अपघाताचीही शक्यता आहे.घराच्या भूखंडाच्या क्षेत्रात घर बांधण्याआधी शासनाच्या घरकुल योजनेतील काही कुटुंबाचे घर असताना ही भूखंड पिडीत कुटुंबावर लादल्याने वादाचा विषय निर्माण झाला आहे. त्याच प्रमाणे एकाच घराचा भूखंड दोन घरपट्टीधारक प्रकल्पग्रस्तांना दिल्यामुळे दोन कुटुंबात वाद उद्भवून प्रश्न अनिर्णित राहण्याची भीती आहे. एकूण १५ ते १६ भूखंड वाटप केलेले असतांना सदर भूखंडाच्या ७/१२ उताऱ्यावर आजही महाराष्ट्र सरकार म्हणून नोंद केलेली आहे. त्यामुळे घराच्या भूखंडाचा ताबा मिळाला तरी ते त्यांच्या मालकीचे न झाल्यामुळे घरमालकाचा कायदेशीर अधिकाराला अडचण आहे तर काही भूखंडावर झालेले अतिक्र मण न उठवल्यामुळे भूखंड वाटप केले असतानाही त्याचा अधिकार मूळ भूखंड मालकास राहिलेला नाही अशा अनेक त्रूटी सर्व्हे सुरु असतांना निदर्शनास आल्यामूळे प्रकल्पग्रस्त संभ्रमात आल्याचे दिसून येत आहे.प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या!आज बहुसंख्य प्रकल्पग्रस्त जातिने उपस्थित राहून त्यांच्या समोर सर्व्हे केला जात असतांना अनेक त्रुटींना सामोरे जावे लागत आहे. दोन्ही गावांच्या पुनर्वसन प्रक्रि येला सुरु वात १९८९ साली करण्यात आली. त्यावेळी पूनर्वसनासंबंधी प्रकल्प ग्रामस्थांमध्ये काहीसे अज्ञान हाते. मात्र, त्यावेळी झालेल्या त्रूटीचा अंदाज आता घेणे गरजेचे असून झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करु न प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची मागणी पोफरण कृती समितीचे अध्यक्ष श्रीधर तामोरे, माजी अध्यक्ष विजय तामोरे, शेखर तामोरे, वीरेंद्र पाटील, सरपंच देवकी खडके, उपसरपंच रविंद्र मोरे यांनी केली आहे.