शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हातोबा देवस्थानाला हवे पर्यटन खात्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:28 IST

संस्थानकाळाचा वारसा लाभलेले मलवाडा गाव : पिंजाळ नदी, निसर्ग सौर्द्य अन् निरव शांतता

राहुल वाडेकर

विक्र मगड : जव्हार संस्थानिकांचा वारसा लाभलेले वाडा व विक्र मगड तालुक्याच्या हद्दीमध्ये असलेले पिंजाळ नदी काठावरील निसर्गाच्या कुषीत वसलेले हातोबा देवस्थान जिल्हयातील ऐतिहासिक देवस्थान म्हणन परिचित आहे. बारमाही भरपूर पाणी असलेली पिंजाळ नदी, हवेत नेहमी असणारा गारवा, नदीच्या दोन्ही बाजूस असलेले फार्महाऊस व वाड्या, चोहीकडे हिरवाईने नटलेला परीसर यामुळे या देवस्थानाकडे वर्षभर पर्यटक व भाविकांची वर्दळ असते.

वाडा, विक्र मगड व जव्हार या तालुक्यातील भक्तांचा येथे नेहमी राबता असतो. हातोबा देवाला बोललेला नवस पुर्ण होत असल्याचे गावकरी मोठ्या श्रद्धेने सांगताना देवस्थाना समोर लाकडी हात, पाय, नाक, डोके, कान. पाळणा यांचा खच दाखवतात. भाविकांनी केलेल्या नवसानुुरुप देवाला वरिल साहित्य वाहण्याची परंपरा येथे आहे.आधुनिक काळातही आलेल्या संकटापुढे गुढगे टेकलेल्या अनेक व्यक्ती येथे येतात व आपल्या झाळीत समाधान घेवून जातात असे येथील पुजारी यांचे म्हणणे आहे. देवस्थानाला लागूनच पिंजाळ नदीचा डोह आहे. त्यात आंघोळीचा व पोहण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांना घेता येतो. तसेच नदीतून होडयांची व लाकडी ताफयांची सफर करण्याची पर्वनी देखील पर्यटकांना मिळते. नदीचा किनारा व घनदाट जंगल असल्यामुळे मोर, ससे, कोल्हे, तरस व रानडुक्कर यांच्यासह विविध पक्षांचे अधून मधून दर्शन होत असते. जवळ असणाऱ्यां मलवाडा गावात १२५ वर्षांची जूनी इमारत व तिच्यावरील नक्षीकाम, गावंदेवी व हनुमान मंदीर त्याचप्रमाणे परीसरातील एकमेव शनि मंदीराचा शेजार हातोबा देवस्थानाला आहे.

सोयींची वानवाप्रसिद्ध देवस्थान, निसर्ग रम्य परिसर असलेल्या या स्थानाकडे अजूनही शासनाचे दुर्लक्ष आहे. या देवस्थानाला येणाºया भाविकांसाठी दोन समाजगृह आहेत. मात्र त्यांची अवस्था दयनीय असून पत्रे, लादया, दरवाजे, खिडक्या पूर्णत: निखळलेल्या आहेत. येथे येणाºया भाविकांना पावसाळयात प्रचंड त्रास होता. स्वच्छता गृहाचा अभाव, विजेची गैरसोय असून शंभर एकर जमिन पडीक आहे.कसे जाल : हातोबा देवस्थानापासून ठाणे ७० कि.मी. अंतरावर असून वाडा १० कि.मी. तर जव्हार २७ कि.मी. आहे. मुंबईहुन पश्चिम रेल्वेने यायचे झाल्यास पालघर रेल्व स्टेशन ला उतरून किंवा ठाण्याहुन विक्रमगड पर्यंत यावे. यासाठी पालघर व ठाणे एसटी स्थानकातून गाड्या उपलब्ध आहेत. विक्रमगडहुन १२ किमीवर असणाºया मलवाडा येथे वडाप द्वारे किंवा खाजगी वाहनाने यावआम्ही वर्षातून अनेक वेळा हातोबा देवस्थानाला भेट देत असतो मात्र याठिकाणी असणाºयां असुविधांमुळे आम्हाला खूप त्रास होता. शासनाने या देवस्थानाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे गरजेचे आहे.- अनिकेत सांबरे, (पर्यटक)आमदार पांडुरंग बरोरा याचा निधीतून या पर्यटन विकासासाठी काही निधी मंजूर झाला आहे. परंतु तो अपुरा आहे. या साठी ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन खात्याने या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषणा करावी.- चेतन कोरे, सामाजिक कार्यकर्ता 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार