शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

हातोबा देवस्थानाला हवे पर्यटन खात्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:28 IST

संस्थानकाळाचा वारसा लाभलेले मलवाडा गाव : पिंजाळ नदी, निसर्ग सौर्द्य अन् निरव शांतता

राहुल वाडेकर

विक्र मगड : जव्हार संस्थानिकांचा वारसा लाभलेले वाडा व विक्र मगड तालुक्याच्या हद्दीमध्ये असलेले पिंजाळ नदी काठावरील निसर्गाच्या कुषीत वसलेले हातोबा देवस्थान जिल्हयातील ऐतिहासिक देवस्थान म्हणन परिचित आहे. बारमाही भरपूर पाणी असलेली पिंजाळ नदी, हवेत नेहमी असणारा गारवा, नदीच्या दोन्ही बाजूस असलेले फार्महाऊस व वाड्या, चोहीकडे हिरवाईने नटलेला परीसर यामुळे या देवस्थानाकडे वर्षभर पर्यटक व भाविकांची वर्दळ असते.

वाडा, विक्र मगड व जव्हार या तालुक्यातील भक्तांचा येथे नेहमी राबता असतो. हातोबा देवाला बोललेला नवस पुर्ण होत असल्याचे गावकरी मोठ्या श्रद्धेने सांगताना देवस्थाना समोर लाकडी हात, पाय, नाक, डोके, कान. पाळणा यांचा खच दाखवतात. भाविकांनी केलेल्या नवसानुुरुप देवाला वरिल साहित्य वाहण्याची परंपरा येथे आहे.आधुनिक काळातही आलेल्या संकटापुढे गुढगे टेकलेल्या अनेक व्यक्ती येथे येतात व आपल्या झाळीत समाधान घेवून जातात असे येथील पुजारी यांचे म्हणणे आहे. देवस्थानाला लागूनच पिंजाळ नदीचा डोह आहे. त्यात आंघोळीचा व पोहण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांना घेता येतो. तसेच नदीतून होडयांची व लाकडी ताफयांची सफर करण्याची पर्वनी देखील पर्यटकांना मिळते. नदीचा किनारा व घनदाट जंगल असल्यामुळे मोर, ससे, कोल्हे, तरस व रानडुक्कर यांच्यासह विविध पक्षांचे अधून मधून दर्शन होत असते. जवळ असणाऱ्यां मलवाडा गावात १२५ वर्षांची जूनी इमारत व तिच्यावरील नक्षीकाम, गावंदेवी व हनुमान मंदीर त्याचप्रमाणे परीसरातील एकमेव शनि मंदीराचा शेजार हातोबा देवस्थानाला आहे.

सोयींची वानवाप्रसिद्ध देवस्थान, निसर्ग रम्य परिसर असलेल्या या स्थानाकडे अजूनही शासनाचे दुर्लक्ष आहे. या देवस्थानाला येणाºया भाविकांसाठी दोन समाजगृह आहेत. मात्र त्यांची अवस्था दयनीय असून पत्रे, लादया, दरवाजे, खिडक्या पूर्णत: निखळलेल्या आहेत. येथे येणाºया भाविकांना पावसाळयात प्रचंड त्रास होता. स्वच्छता गृहाचा अभाव, विजेची गैरसोय असून शंभर एकर जमिन पडीक आहे.कसे जाल : हातोबा देवस्थानापासून ठाणे ७० कि.मी. अंतरावर असून वाडा १० कि.मी. तर जव्हार २७ कि.मी. आहे. मुंबईहुन पश्चिम रेल्वेने यायचे झाल्यास पालघर रेल्व स्टेशन ला उतरून किंवा ठाण्याहुन विक्रमगड पर्यंत यावे. यासाठी पालघर व ठाणे एसटी स्थानकातून गाड्या उपलब्ध आहेत. विक्रमगडहुन १२ किमीवर असणाºया मलवाडा येथे वडाप द्वारे किंवा खाजगी वाहनाने यावआम्ही वर्षातून अनेक वेळा हातोबा देवस्थानाला भेट देत असतो मात्र याठिकाणी असणाºयां असुविधांमुळे आम्हाला खूप त्रास होता. शासनाने या देवस्थानाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे गरजेचे आहे.- अनिकेत सांबरे, (पर्यटक)आमदार पांडुरंग बरोरा याचा निधीतून या पर्यटन विकासासाठी काही निधी मंजूर झाला आहे. परंतु तो अपुरा आहे. या साठी ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन खात्याने या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषणा करावी.- चेतन कोरे, सामाजिक कार्यकर्ता 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार