शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

हातोबा देवस्थानाला हवे पर्यटन खात्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:28 IST

संस्थानकाळाचा वारसा लाभलेले मलवाडा गाव : पिंजाळ नदी, निसर्ग सौर्द्य अन् निरव शांतता

राहुल वाडेकर

विक्र मगड : जव्हार संस्थानिकांचा वारसा लाभलेले वाडा व विक्र मगड तालुक्याच्या हद्दीमध्ये असलेले पिंजाळ नदी काठावरील निसर्गाच्या कुषीत वसलेले हातोबा देवस्थान जिल्हयातील ऐतिहासिक देवस्थान म्हणन परिचित आहे. बारमाही भरपूर पाणी असलेली पिंजाळ नदी, हवेत नेहमी असणारा गारवा, नदीच्या दोन्ही बाजूस असलेले फार्महाऊस व वाड्या, चोहीकडे हिरवाईने नटलेला परीसर यामुळे या देवस्थानाकडे वर्षभर पर्यटक व भाविकांची वर्दळ असते.

वाडा, विक्र मगड व जव्हार या तालुक्यातील भक्तांचा येथे नेहमी राबता असतो. हातोबा देवाला बोललेला नवस पुर्ण होत असल्याचे गावकरी मोठ्या श्रद्धेने सांगताना देवस्थाना समोर लाकडी हात, पाय, नाक, डोके, कान. पाळणा यांचा खच दाखवतात. भाविकांनी केलेल्या नवसानुुरुप देवाला वरिल साहित्य वाहण्याची परंपरा येथे आहे.आधुनिक काळातही आलेल्या संकटापुढे गुढगे टेकलेल्या अनेक व्यक्ती येथे येतात व आपल्या झाळीत समाधान घेवून जातात असे येथील पुजारी यांचे म्हणणे आहे. देवस्थानाला लागूनच पिंजाळ नदीचा डोह आहे. त्यात आंघोळीचा व पोहण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांना घेता येतो. तसेच नदीतून होडयांची व लाकडी ताफयांची सफर करण्याची पर्वनी देखील पर्यटकांना मिळते. नदीचा किनारा व घनदाट जंगल असल्यामुळे मोर, ससे, कोल्हे, तरस व रानडुक्कर यांच्यासह विविध पक्षांचे अधून मधून दर्शन होत असते. जवळ असणाऱ्यां मलवाडा गावात १२५ वर्षांची जूनी इमारत व तिच्यावरील नक्षीकाम, गावंदेवी व हनुमान मंदीर त्याचप्रमाणे परीसरातील एकमेव शनि मंदीराचा शेजार हातोबा देवस्थानाला आहे.

सोयींची वानवाप्रसिद्ध देवस्थान, निसर्ग रम्य परिसर असलेल्या या स्थानाकडे अजूनही शासनाचे दुर्लक्ष आहे. या देवस्थानाला येणाºया भाविकांसाठी दोन समाजगृह आहेत. मात्र त्यांची अवस्था दयनीय असून पत्रे, लादया, दरवाजे, खिडक्या पूर्णत: निखळलेल्या आहेत. येथे येणाºया भाविकांना पावसाळयात प्रचंड त्रास होता. स्वच्छता गृहाचा अभाव, विजेची गैरसोय असून शंभर एकर जमिन पडीक आहे.कसे जाल : हातोबा देवस्थानापासून ठाणे ७० कि.मी. अंतरावर असून वाडा १० कि.मी. तर जव्हार २७ कि.मी. आहे. मुंबईहुन पश्चिम रेल्वेने यायचे झाल्यास पालघर रेल्व स्टेशन ला उतरून किंवा ठाण्याहुन विक्रमगड पर्यंत यावे. यासाठी पालघर व ठाणे एसटी स्थानकातून गाड्या उपलब्ध आहेत. विक्रमगडहुन १२ किमीवर असणाºया मलवाडा येथे वडाप द्वारे किंवा खाजगी वाहनाने यावआम्ही वर्षातून अनेक वेळा हातोबा देवस्थानाला भेट देत असतो मात्र याठिकाणी असणाºयां असुविधांमुळे आम्हाला खूप त्रास होता. शासनाने या देवस्थानाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे गरजेचे आहे.- अनिकेत सांबरे, (पर्यटक)आमदार पांडुरंग बरोरा याचा निधीतून या पर्यटन विकासासाठी काही निधी मंजूर झाला आहे. परंतु तो अपुरा आहे. या साठी ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन खात्याने या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषणा करावी.- चेतन कोरे, सामाजिक कार्यकर्ता 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार