शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हातणेचा मुंगूर मत्स्य प्रकल्प अखेर बंद

By admin | Updated: February 1, 2017 02:56 IST

हातने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारा व देहर्जा नदीला प्रदूषित करणारा मुंगूर मत्स्य प्रकल्प बंद करण्याचे व त्यातील मत्स्यसाठा नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- राहुल वाडेकर,  विक्र मगडहातने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारा व देहर्जा नदीला प्रदूषित करणारा मुंगूर मत्स्य प्रकल्प बंद करण्याचे व त्यातील मत्स्यसाठा नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमीन फार्म प्रा. लि. च्या सात तलावामध्ये मुंगुर मशांचे पालन व उत्पादन घेतले जात होते. त्यातील माशांना खाद्य म्हणून कोंबडीची सडलेली आतडी, कुजलेले मांस टाकले जात असल्यामुळे गावामध्ये तसेच आजूबाजूलला दुर्गंधी पसरत होती. हे दूषित पाणी सोडले जात असल्याने देहर्जा नदी दूषित होत होती. त्यामुळे आजू-बाजूच्या गावामध्ये रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. या तलावांमधील दूषित पाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली होती. याबाबचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्याने हा आदेश जारी झाला आहे. या बाबत ग्रामपंचायतीने या फार्मच्या मालकाला नोटिस बजावूनही तिच्याकडे दुर्लक्ष करून उत्पादन सुरूच ठेवले. याबाबत येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी सरकारी पातळीवर निवेदन व पाठपुरावा केला. त्यानंतर आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासाहित चौकशी करून त्याबाबतच्या अहवालात या मस्त्य प्रकल्पाने आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा ठपका ठेवला होता. या बाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त व तहसीलदार यांनी चौकशीचे आदेश दिले. मंगूर हे मांसाहारी असल्याने भारतीय मासळीच्या प्रजाती नामशेष होणार असल्याने मुंगूरचे संवर्धन, पणन यास प्रतिबंध करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार हा प्रकल्प त्वरित बंद करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पालघर (ठाणे) यांनी दिले आहेत. जर हा प्रकल्प बंद न केल्यास कायदेशीर कार्रवाई केली जाईल असा उल्लेख या अहवालात केला आहे. मुंगूर माशाच्या प्रकल्पातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. हे पाणी देहर्जा नदीच्या पात्रात सोडले जायचे त्यामुळे नदीही दूषित व्हायची. हा प्रकल्प बंद व्हावा म्हणून आम्ही शासनाकडे ग्रामपंचायतस्तरावरून वेळो-वेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र याबाबत शासनाकडून कुठली ही कारवाई केली जात नव्हती. अखेर हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश आज आले आहेत.-नंदीनी डोले, सरपंच, देहर्जा, हातणे ग्रामपंचायात

गावात माशांचे, डासांचे प्रमाण वाढले होते. या बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणेने चौकशी केली व या प्रकल्प बंद केला हे उत्तम झाले. -नितिन डोले, ग्रामस्थ, हातने गाव