शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचा विविध मागण्यांसाठी हंडामोर्चा

By admin | Updated: March 29, 2016 03:01 IST

तारापूरअणुऊर्जा प्रकल्प तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी आपल्या विविध मागण्यांकरीता तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहती

बोईसर : तारापूरअणुऊर्जा प्रकल्प तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी आपल्या विविध मागण्यांकरीता तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहती वसाहतीवर हंडा मोर्चा नेऊन सुमारे चार तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालघरचे तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी येऊन निवेदन स्वीकारले व मागण्या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. काढण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त कामगारांना त्वरीत कामावर घेणे, अक्करपट्टी व पोफरण या दोन्ही पुनर्वसित गावांची पाणीपुरवठा योजना सुरळीत करावी, नवीन बी. ए. आर. सी. प्रकल्पात पोफरण व अक्करपट्टी प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने रोजगार मिळावा, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या शाळेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना तसेच प्रकल्पाच्या पाच कि. मी. परिघातील मुलांनी विनामूल्य प्रवेश देण्यात यावा, या मागण्यांकरीता पास्थळच्या पेट्रोल पंपापासून अणुऊर्जा केंद्र कर्मचारी वसाहतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. (वार्ताहर)प्रकल्प उभारताना आश्वासनांची उधळण व खैरात होत होती परंतु आता आमचा कुणीही वाली नसून आमची घरेदारे गेली. शेतजमिनी गेल्या. पारंपारीक मच्छीमारी करून उदरनिर्वाह करण्यास हातभार लावणारे समुद्र किनारेही गेले आणि आता प्रकल्पात नोकरीही नाही. आता आम्ही कसे जगायचे? हा प्रश्न प्रकल्पग्रस्तांनी विचारला आहे.