शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोवा पुलाबाबत हलगर्जी

By admin | Updated: August 8, 2016 02:01 IST

मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक असलेला वर्सोवा खाडी पूल धोकादाक असल्याने त्यावरून जाण्यास जड वाहनांना बंदी असल्याचा फलक हायवेच्या दूरवर असलेल्या पोलीस चौकीच्या

शशी करपे, वसईमुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक असलेला वर्सोवा खाडी पूल धोकादाक असल्याने त्यावरून जाण्यास जड वाहनांना बंदी असल्याचा फलक हायवेच्या दूरवर असलेल्या पोलीस चौकीच्या भिंतीवर लावून प्रशासनाने हलगर्जीपणाचा केला आहे. यावर कळस म्हणजे गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी मोठ्या लक्झरी बसेससह ट्रक आणि अवजड वाहनांसह अनेक वाहने त्यावर उभी केली जात आहेत.१९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत असून यावरून अवजड वाहनांना वाहतुकीला प्रतिबंध करावा असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना ११ जुलै २०१४ रोजी दिले होते. मात्र, त्यानंतरही या पूलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात ेयेत आहे. त्यातही हा पूल धोकादायक असल्याने त्यावरून १५ टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई असल्याचा फलक वर्सोवा पूलाच्या पलिकडे रस्त्यापासून दूरवर असलेल्या पोलीस चौकीच्या भिंतीवर लावण्यात आलेला आहे. चौकीसमोर सिग्नल आहे. चौकी हायवेपासून तशी दूरवर असून त्या फलकाकडे तशी कुणाची नजरही पोचत नाही. फलक कुणाच्या लक्षातही येणार नाही अशा जागी लावण्यात आलेला आहे. हायवेच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांना वाहतूक बंदी असल्याचा एकही सूचना फलक लावण्यात आलेला नाही. यावरून पूल धोकादाक असतानाही प्रशासनाचे उदासिन धोरण चव्हाट्यावर आले आहे. रात्रीच्या वेळी चौकीत पोलिसांचा राबता खूपच कमी आहे. त्यामुळे वर्सोवा पुलावरून अवजड वाहनांची सर्रासपणे वाहतूक होताना दिसते. पुलाच्या कडेला अथवा पूलावर वाहनांना थांबण्यास मनाई करावी असेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बजावले आहे. मात्र, गुजरातकडे जाणाऱ्या मोठ-मोठ्या लक्झरी बसेस प्रवासी भरण्यासाठी हायवे आणि पुलावरच्या थांबवल्या जातात. त्यांच्यासोबत ट्रक, टेम्पो, खाजगी वाहने यासह विविध वाहने प्रवासी भरण्यासाठी थांबलेली असतात. त्यामुळे पूलावर कायम वाहतूककोंडी झालेली दिसून असते. हा प्रकार पोलीस चौकीला लागूनच होत असताना ट्रॅफिक पोलीस त्याकडे काणाडोळा करीत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीकडेही संशयाने पाहिले जात आहे.