शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

वर्सोवा पुलाबाबत हलगर्जी

By admin | Updated: August 8, 2016 02:01 IST

मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक असलेला वर्सोवा खाडी पूल धोकादाक असल्याने त्यावरून जाण्यास जड वाहनांना बंदी असल्याचा फलक हायवेच्या दूरवर असलेल्या पोलीस चौकीच्या

शशी करपे, वसईमुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक असलेला वर्सोवा खाडी पूल धोकादाक असल्याने त्यावरून जाण्यास जड वाहनांना बंदी असल्याचा फलक हायवेच्या दूरवर असलेल्या पोलीस चौकीच्या भिंतीवर लावून प्रशासनाने हलगर्जीपणाचा केला आहे. यावर कळस म्हणजे गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी मोठ्या लक्झरी बसेससह ट्रक आणि अवजड वाहनांसह अनेक वाहने त्यावर उभी केली जात आहेत.१९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत असून यावरून अवजड वाहनांना वाहतुकीला प्रतिबंध करावा असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना ११ जुलै २०१४ रोजी दिले होते. मात्र, त्यानंतरही या पूलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात ेयेत आहे. त्यातही हा पूल धोकादायक असल्याने त्यावरून १५ टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई असल्याचा फलक वर्सोवा पूलाच्या पलिकडे रस्त्यापासून दूरवर असलेल्या पोलीस चौकीच्या भिंतीवर लावण्यात आलेला आहे. चौकीसमोर सिग्नल आहे. चौकी हायवेपासून तशी दूरवर असून त्या फलकाकडे तशी कुणाची नजरही पोचत नाही. फलक कुणाच्या लक्षातही येणार नाही अशा जागी लावण्यात आलेला आहे. हायवेच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांना वाहतूक बंदी असल्याचा एकही सूचना फलक लावण्यात आलेला नाही. यावरून पूल धोकादाक असतानाही प्रशासनाचे उदासिन धोरण चव्हाट्यावर आले आहे. रात्रीच्या वेळी चौकीत पोलिसांचा राबता खूपच कमी आहे. त्यामुळे वर्सोवा पुलावरून अवजड वाहनांची सर्रासपणे वाहतूक होताना दिसते. पुलाच्या कडेला अथवा पूलावर वाहनांना थांबण्यास मनाई करावी असेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बजावले आहे. मात्र, गुजरातकडे जाणाऱ्या मोठ-मोठ्या लक्झरी बसेस प्रवासी भरण्यासाठी हायवे आणि पुलावरच्या थांबवल्या जातात. त्यांच्यासोबत ट्रक, टेम्पो, खाजगी वाहने यासह विविध वाहने प्रवासी भरण्यासाठी थांबलेली असतात. त्यामुळे पूलावर कायम वाहतूककोंडी झालेली दिसून असते. हा प्रकार पोलीस चौकीला लागूनच होत असताना ट्रॅफिक पोलीस त्याकडे काणाडोळा करीत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीकडेही संशयाने पाहिले जात आहे.