शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
5
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
6
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
7
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
8
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
9
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
10
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
12
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
13
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
14
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
15
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
16
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
17
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
18
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
19
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...

गटारे, पाण्याचा प्रश्न सुटणार?, निरी व आयआयटी प्रस्तावाचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:26 IST

वसई-विरार महापालिका महासभा : निरी व आयआयटी प्रस्तावाचे सादरीकरण

वसई : वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी संध्याकाळी उशिरा सुरू झालेल्या महासभेत पहिले काही तास निरी व आयआयटीच्या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यातच गेले. या महासभेत प्रामुख्याने प्रशासकीय मंजुऱ्या, ७५ लाखांवरील प्रभागातील विकासकामे, तर विविध योजना व त्यांची अंमलबजावणी याचबरोबर भगीरथ ट्रान्सपोर्ट कंपनी व त्यांच्या शहरात चालणाºया परिवहन बसेस या विषयावरील चर्चा बरीच गाजली.

परिवहन करार रद्द करणे, परिवहन समिती गठीत करणे, औद्योगिक भागात अग्निशमन दलाचे केंद्र उभारणे आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली. मात्र या महासभेत परिवहन प्रश्न व शहरातील सखल भाग, बेकायदा बांधकामे, पाणी, गटारे आणि खासकरून निरी व आयआयटीने दिलेल्या सूचना व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सभागृहात आजीव पाटील, प्रशांत राऊत, प्रवीणा ठाकूर, उमेश नाईक तर विरोधकांमध्ये सेनेच्या किरण चेंदवणकर आदींनी विस्तृत चर्चा घडवून आणून या संदर्भातील अनेक प्रशासकीय विषयांवर सकारात्मक चर्चा व निर्णय घेण्यात आले.शहरातील सखल भाग, बेकायदेशीर बांधकाम, गटारे, नाले, निरी व आयआयटीने दिलेल्या सूचना व उपाययोजना यांची लवकरच पावसाळ्याआधी अंमलबजावणी करण्यासाठी महासभेने मंजुरी दिली आहे. पुढील दिवसांत महापौर प्रवीण शेट्टी हे निरी व आयआयटीच्या अधिकारीवर्गाची भेट घेऊन पुढील व्यूहरचना आखतील, असेही सांगण्यात आले.महासभेत परिवहन प्रश्न बºयापैकी गाजला, मात्र या वेळी भगीरथ ट्रान्सपोर्ट कं.ने महापालिका प्रशासनाला आपल्याला शहरात बसेस चालवणे परवडत नाही. बहुतेक बसेस नादुरुस्त आहेत. बºयापैकी रक्कम शासनाला भरणे आहे. अपघात, नासधूस, कामगार प्रश्न, त्यांचे आंदोलन व उपोषण आदी प्रश्नांमुळे मला आपण या सेवेतून मुक्त करा, असा प्रस्ताव मांडला गेला. विरोधक सेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी या प्रस्तावाच्या बाजूने ठराव मांडला. परंतु सत्ताधारी बविआच्या सर्व नगरसेवकांनी हा करार भगीरथने पाळणे आवश्यक आहे. काही केल्या हा परिवहन करार रद्द होणार नाही, अशी भूमिका घेत भगीरथ ट्रान्सपोर्टचा पालिकेशी असलेला परिवहन करार रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत एकमताने फेटाळून लावून भगीरथ ट्रान्सपोर्टला धक्का दिला.सुसज्ज अग्निशमन केंद्राचा विषय चर्चेस आलाच नाहीच्वसई : वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमध्ये लागणाºया आगीच्या घटनांवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी वसाहतीतच अग्निशमन केंद्र उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. वालीव येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन कोटी २४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयारकेले होते.च्हा विषय महासभेसमोर ठेवण्यात येणार होता, परंतु परिवहन, निरी व आयआयटीसह इतर विषयांवरील चर्चेत जास्त वेळ गेल्यामुळे हा विषय चर्चेस आला नाही.मूळातच हे अग्निशमन केंद्र तयार झाल्यास औद्योगिक वसाहतीला दिलासा मिळणार आहे, मात्र या महत्त्वाच्या विषयाच्या मंजुरीसाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावीलागणार आहे.च् वसई पूर्वेला वालीव, सातिवली, गावराईपाडा, भोईदापाडा, चिंचपाडा, गोलाणी मार्ग, वसई फाटा महामार्ग या भागात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी मुंबईसह ठाणे, पनवेल, पालघर जिल्ह्यातील कामगार येतात. औद्योगिक भागात या ठिकाणी अनेक छोटे-मोठे कारखाने असून आगीच्या घटना अधूनमधून घडत असतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार