शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गटारे, पाण्याचा प्रश्न सुटणार?, निरी व आयआयटी प्रस्तावाचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:26 IST

वसई-विरार महापालिका महासभा : निरी व आयआयटी प्रस्तावाचे सादरीकरण

वसई : वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी संध्याकाळी उशिरा सुरू झालेल्या महासभेत पहिले काही तास निरी व आयआयटीच्या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यातच गेले. या महासभेत प्रामुख्याने प्रशासकीय मंजुऱ्या, ७५ लाखांवरील प्रभागातील विकासकामे, तर विविध योजना व त्यांची अंमलबजावणी याचबरोबर भगीरथ ट्रान्सपोर्ट कंपनी व त्यांच्या शहरात चालणाºया परिवहन बसेस या विषयावरील चर्चा बरीच गाजली.

परिवहन करार रद्द करणे, परिवहन समिती गठीत करणे, औद्योगिक भागात अग्निशमन दलाचे केंद्र उभारणे आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली. मात्र या महासभेत परिवहन प्रश्न व शहरातील सखल भाग, बेकायदा बांधकामे, पाणी, गटारे आणि खासकरून निरी व आयआयटीने दिलेल्या सूचना व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सभागृहात आजीव पाटील, प्रशांत राऊत, प्रवीणा ठाकूर, उमेश नाईक तर विरोधकांमध्ये सेनेच्या किरण चेंदवणकर आदींनी विस्तृत चर्चा घडवून आणून या संदर्भातील अनेक प्रशासकीय विषयांवर सकारात्मक चर्चा व निर्णय घेण्यात आले.शहरातील सखल भाग, बेकायदेशीर बांधकाम, गटारे, नाले, निरी व आयआयटीने दिलेल्या सूचना व उपाययोजना यांची लवकरच पावसाळ्याआधी अंमलबजावणी करण्यासाठी महासभेने मंजुरी दिली आहे. पुढील दिवसांत महापौर प्रवीण शेट्टी हे निरी व आयआयटीच्या अधिकारीवर्गाची भेट घेऊन पुढील व्यूहरचना आखतील, असेही सांगण्यात आले.महासभेत परिवहन प्रश्न बºयापैकी गाजला, मात्र या वेळी भगीरथ ट्रान्सपोर्ट कं.ने महापालिका प्रशासनाला आपल्याला शहरात बसेस चालवणे परवडत नाही. बहुतेक बसेस नादुरुस्त आहेत. बºयापैकी रक्कम शासनाला भरणे आहे. अपघात, नासधूस, कामगार प्रश्न, त्यांचे आंदोलन व उपोषण आदी प्रश्नांमुळे मला आपण या सेवेतून मुक्त करा, असा प्रस्ताव मांडला गेला. विरोधक सेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी या प्रस्तावाच्या बाजूने ठराव मांडला. परंतु सत्ताधारी बविआच्या सर्व नगरसेवकांनी हा करार भगीरथने पाळणे आवश्यक आहे. काही केल्या हा परिवहन करार रद्द होणार नाही, अशी भूमिका घेत भगीरथ ट्रान्सपोर्टचा पालिकेशी असलेला परिवहन करार रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत एकमताने फेटाळून लावून भगीरथ ट्रान्सपोर्टला धक्का दिला.सुसज्ज अग्निशमन केंद्राचा विषय चर्चेस आलाच नाहीच्वसई : वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमध्ये लागणाºया आगीच्या घटनांवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी वसाहतीतच अग्निशमन केंद्र उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. वालीव येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन कोटी २४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयारकेले होते.च्हा विषय महासभेसमोर ठेवण्यात येणार होता, परंतु परिवहन, निरी व आयआयटीसह इतर विषयांवरील चर्चेत जास्त वेळ गेल्यामुळे हा विषय चर्चेस आला नाही.मूळातच हे अग्निशमन केंद्र तयार झाल्यास औद्योगिक वसाहतीला दिलासा मिळणार आहे, मात्र या महत्त्वाच्या विषयाच्या मंजुरीसाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावीलागणार आहे.च् वसई पूर्वेला वालीव, सातिवली, गावराईपाडा, भोईदापाडा, चिंचपाडा, गोलाणी मार्ग, वसई फाटा महामार्ग या भागात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी मुंबईसह ठाणे, पनवेल, पालघर जिल्ह्यातील कामगार येतात. औद्योगिक भागात या ठिकाणी अनेक छोटे-मोठे कारखाने असून आगीच्या घटना अधूनमधून घडत असतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार