शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे कृषीशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 02:30 IST

योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढीसाठी कृषी सल्ल्याची आवश्यकता असते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शेत पिकाचे संरक्षण आणि उत्पादन विक्रीच्या मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांना बेजार केले. दरम्यान, कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने सोशल मीडियाचा खुबीने वापर केल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या मार्गदर्शन मिळते आहे. लॉकडाऊनमुळे शेतकºयांपुढील अडचणी वाढल्या आहेत. शेतपिकांचे कीड - रोगापासून संरक्षण तसेच संवर्धन, तसेच योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढीसाठी कृषी सल्ल्याची आवश्यकता असते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.दरम्यान, जिल्ह्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. या संचारबंदीच्या काळात शेतकºयांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोशल मीडियाच्या वापरावर अधिक भर दिल्याची माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी दिली. त्यानुसार शेतकºयांनी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून शेतीची कामे करताना तोंडाला मास्कचा वापर, सॅनिटायझरचा उपयोग याविषयी आकाशवाणीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यामुळे पिकांची तोडणी, वर्गवारी आणि निर्यात करताना योग्य खबरदारी घेतल्याची माहिती शेतकºयांनी दिली.पीक संरक्षणतज्ज्ञामार्फत जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या चिकू, आंबा आणि अन्य भाजीपाला पिकावर कधी कीटकनाशकाची फवारणी करावी याची माहिती दिली जाते. जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी आणि डहाणू येथील शेतकºयांना बांधावर मार्गदर्शन देण्याची जबाबदारी कृषीतज्ज्ञ चोख बजावत आहेत.यासाठी त्यांच्याकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. जिल्ह्यातील विविध शेतकºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शास्त्रज्ञांना जोडले आहे, वेळप्रसंगी नवीन ग्रुपची निर्मिती झाली आहे. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी व्हिडिओ कॉलिंगचा पर्यायही स्वीकारला जातो.>संचारबंदी असल्याने शेतमाल निर्यातीचे परवाने, शहरातील बाजारपेठांचे नियोजन समजावून घेणे शक्य झाले. त्यामुळेच काही उत्पादक या काळात स्वत: निर्यातदार आणि विक्रेताही बनले. या केंद्राच्या गृहविज्ञानतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महिला शेतकरी गटातील सदस्यांना मास्कनिर्मितीचे तंत्र शिकवून आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. हे करताना मालाची आॅर्डर घेण्याचे कामही केंद्रामार्फत केले जाते.