शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

पालकमंत्र्यांना जिल्ह्यासाठी वेळच नाही

By admin | Updated: September 3, 2015 02:44 IST

पालघर नावापुरताच जिल्हा झाला, मात्र अजून कुठलेही व्हिजन नाही. त्यामुळे ठाणे जिल्हा बरा होता असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

पालघर : पालघर नावापुरताच जिल्हा झाला, मात्र अजून कुठलेही व्हिजन नाही. त्यामुळे ठाणे जिल्हा बरा होता असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे. पालघरच्या विकासासाठी आमच्या पालकमंत्र्यांना वेळच मिळत नसल्याची खंत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे व्यक्त केली.ते म्हणाले की, वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे औत्सुक्य राष्ट्रीय पातळीवर निर्माण झाले होते. या निवडणुकीत सर्व जातीधर्माच्या, विविध स्तरावरील उमेदवारांना उमेदवारी दिली. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच आम्ही एकहाती सत्ता मिळवू शकलो. पालघरमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे आम्ही दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. पालघरची पोट निवडणूक जिंकायची असेल तर नको ती आश्वासने देत मतदारांची फसवणूक करणारा कार्यकर्ता मला नको तर वास्तविकतेचे भान ठेवून स्वत:ला कार्यात झोकून देणारा कार्यकर्ता हवा. नवनिर्मित पालघर जिल्ह्णाच्या समस्यांबाबत किती दिवस ओरडत बसाल त्यापेक्षा उपलब्ध परिस्थितीशी सामना करून पुढे जायला हवे. पालघरच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. विकासात्मक कामे मतदारापर्यंत पोहचवली तर आपल्याला यश नक्कीच मिळेल असा विश्वास माजी महापौर राजीव पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी पालघरच्या विठ्ठल रखुमाई सभागृहात पार पडली. यावेळी माजी महापौर राजीव पाटील, आ. विलास तरे, ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, माजी आ. मनिषा निमकर, प्रविण राऊत, सुभाष तामोरे, प्रशांत पाटील, सुरेश तरे इ. मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात बविआच्या पदाधिकाऱ्यांची निवड व पालघर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी सर्व वरिष्ठांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी बविआत प्रवेश केला. (वार्ताहर)