शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत कोसळली, पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:33 IST

वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने थोडी खचली होती.

वाडा : वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने थोडी खचली होती. मात्र त्याकडे बांधकाम विभाग आणि भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याचा ठेका घेतलेल्या सुप्रीम कंपनीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही भिंत ह्या वर्षाच्या पावसामधे पूर्णपणे खचून नदीपात्रात आली आहे त्यामुळे पुलाचा भराव आणि नदीचा काठ मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे त्यामुळे ह्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यातच नवीन पूलगेल्या तीन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे ह्याच जुन्या पुलावरुन अवजड आणि इतर वाहतूक सुरु आहे.पिंजाळ नदी सह्याद्रीच्या डोंगर-दºयांमधे उगम पावते आणि ती वाहत असलेल्या भागात पावसाचे प्रमाण सुद्धा जास्त आहे त्यामुळे ह्या नदीच्या प्रवाहाचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे अशा संरक्षक भिंतीमुळे ह्या नदीवरील पूलांना मजबूती मिळते मात्र संरक्षक भिंती कोसळल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. जर मुसळधार पाऊस पडून नदीला मोठा पूर आल्यास सावित्री नदीवर झालेल्या अपघातासारखा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ह्या रस्त्याच्या ठेका घेतलेल्या सुप्रीम कंपनीने ह्या घटनेकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर नवीन संरक्षक भिंत बांधावी तसेच ह्या पूलाच्या बाजूला अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी वाहनचालकांकडून तसेच प्रवाशांकडून होत आहे.