शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत कोसळली, पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:33 IST

वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने थोडी खचली होती.

वाडा : वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पिंजाळ नदीवरील पुलाची संरक्षक भिंत गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने थोडी खचली होती. मात्र त्याकडे बांधकाम विभाग आणि भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याचा ठेका घेतलेल्या सुप्रीम कंपनीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही भिंत ह्या वर्षाच्या पावसामधे पूर्णपणे खचून नदीपात्रात आली आहे त्यामुळे पुलाचा भराव आणि नदीचा काठ मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे त्यामुळे ह्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यातच नवीन पूलगेल्या तीन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे ह्याच जुन्या पुलावरुन अवजड आणि इतर वाहतूक सुरु आहे.पिंजाळ नदी सह्याद्रीच्या डोंगर-दºयांमधे उगम पावते आणि ती वाहत असलेल्या भागात पावसाचे प्रमाण सुद्धा जास्त आहे त्यामुळे ह्या नदीच्या प्रवाहाचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे अशा संरक्षक भिंतीमुळे ह्या नदीवरील पूलांना मजबूती मिळते मात्र संरक्षक भिंती कोसळल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. जर मुसळधार पाऊस पडून नदीला मोठा पूर आल्यास सावित्री नदीवर झालेल्या अपघातासारखा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ह्या रस्त्याच्या ठेका घेतलेल्या सुप्रीम कंपनीने ह्या घटनेकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर नवीन संरक्षक भिंत बांधावी तसेच ह्या पूलाच्या बाजूला अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी वाहनचालकांकडून तसेच प्रवाशांकडून होत आहे.