शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

वाढवण बंदराच्या कामास सहा महिन्यांत प्रारंभ

By admin | Updated: October 14, 2015 02:23 IST

भूमीपुत्रांच्या प्रखर विरोधामुळे १९९६ मध्ये रद्द झालेल्या व केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येताच पुन्हा साकार होऊ घातलेल्या वाढवण बंदराचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल

पालघर : भूमीपुत्रांच्या प्रखर विरोधामुळे १९९६ मध्ये रद्द झालेल्या व केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येताच पुन्हा साकार होऊ घातलेल्या वाढवण बंदराचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल व त्याचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान आणि मी महाराष्ट्रात पुन्हा येऊ, त्याचा शानदार सोहळा होईल, असा गौप्यस्फोट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटीच्या विस्तार सोहळ्यात केल्यामुळे पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नेहरू सेंटरमध्ये अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र ही गुंतवणूक परिषद घेतली होती. तिच्यात झालेला सर्वात मोठा गुंतवणूक करार हा वाढवण बंदराचा होता. आॅस्ट्रेलियातील पी अ‍ॅन्ड ओ या कंपनीला हे बंदर साकारणे व चालविणे याचा ठेका दिला होता. त्याबाबतचे इरादा पत्र तिला तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते देण्यात आले होते. परंतु त्याला भूमीपुत्रांनी विरोध केला होता. जवळपास ४० हजार रहिवाशांनी आपल्या स्वाक्षऱ्यानिशी या बंदराला विरोध करणारे निवेदन शिवसेनाप्रमुखांना दिले होते. त्यानुसार त्यांनी सरकारला हा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ते रद्द झालेही होते. परंतु २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हा प्रकल्प साकार करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. (वार्ताहर)