शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

तारापुरातील वाढते नागरीकरण चिंतेस कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:12 IST

Tarapur News: तारापूर अणुऊर्जा केंद्रापासून ५ किलोमीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा नागरीकरण सुरू आहे. त्याबाबत संबंधित सरकारी यंत्रणांचे कोणतेही निश्चित असे धोरण नसल्याचे दिसते. बेकायदा उभ्या राहणाऱ्या या बांधकामावर कोणाचेही नियंत्रण नाही.

- हितेन नाईक(पालघर समन्वयक)तारापूर अणुऊर्जा केंद्रापासून ५ किलोमीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा नागरीकरण सुरू आहे. त्याबाबत संबंधित सरकारी यंत्रणांचे कोणतेही निश्चित असे धोरण नसल्याचे दिसते. बेकायदा उभ्या राहणाऱ्या या बांधकामावर कोणाचेही नियंत्रण नाही. अणुऊर्जा प्रकल्पात किरणोत्सर्गासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हाहाकार उडण्याची भीती आहे.

अणुऊर्जा केंद्रात दुर्घटना घडून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी सराव चाचण्या केल्या जातात. त्यातून लोकांचे प्रबोधन केले जाते. मात्र, एकाच वेळी शेकडो, हजारो किंवा लाखो लोक दुर्घटनेत अडकले, तर प्रकल्प यंत्रणा वा जिल्हा आपत्ती प्राधिकरण यांच्याकडे ठोस नियोजन असल्याचा विश्वास अणुऊर्जा प्रकल्प व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अद्याप देऊ शकलेले नाही. सरावादरम्यान मोजक्याच लोकांना त्या परिसरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविताना या साऱ्या यंत्रणांची उडणारी तारांबळ लक्षात घेता, ५ किलोमीटर परिसरातील रहिवाशांना एकाच वेळी बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेताना त्यांची काय भंबेरी उडू शकते, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.

अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तारापूर अणुऊर्जा केंद्रात १७ जानेवारी २०२० रोजी वायु विसर्जनाच्या चिमणीत स्फोट झाल्याने पहिल्या टप्प्यातील वीज निर्मिती काही काळासाठी बंद केली होती. हायड्रोजन वायूचा स्फोट झाल्याची माहिती पुढे आल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. एकात्मिक अणुपुनर्प्रक्रिया केंद्र (आयएनआरपी)मध्ये अधूनमधून घडणारे अपघात, आत्महत्या आदींमुळे सर्वसामान्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

अणुऊर्जा प्रकल्पात वायू गळती अथवा एखादी किरणोत्सर्गाची दुर्घटना घडल्यास सुमारे २० किलोमीटर क्षेत्रातील लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी कुठलीही ठोस व्यवस्था निर्माण करण्यात आलेली नाही. मॉकड्रिलसारख्या कागदावर तयार करण्यात येणाऱ्या योजनेत अनेक उणिवा असल्याचे निदर्शनास आले होते. तारापूर, घिवली, पाचमार्ग, कुडन उच्छळी, दांडी आदी परिसरातील सुमारे १० ते १५ लाख लोकसंख्येला एकाच वेळी बाहेर काढण्याचे ठोस नियोजन यंत्रणांकडे तयार असल्याचे दिसत नाही. दुसरीकडे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येने लोकांना, वाहनांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोठे रस्ते, पूल आदी पायाभूत सुविधाच उभारल्या नसल्याचे दिसते.‘बीएआरसी’च्या गेटसमोर १.६ किमी परिसरात परप्रांतीयांची वसाहत आहे. दुकाने थाटलेली आहेत. तारापूर बायपास रस्त्यावर ५ किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्रात तिवरांची कत्तल करून तेथे बेकायदा वसाहती उभ्या राहिल्या आहेत, राहत आहेत. या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या अनेक गावांत राहणारे भाडेकरू, कामगार यांच्या कागदपत्रांची छाननी, पडताळणी करण्याची गरज आहे. हा भाग संवेदनशील असल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हे करणे आवश्यक आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या आसपास काही बांगलादेशीय राहत असल्याचा स्थानिकांना संशय आहे. त्यादृष्टीनेही तपास करणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :palgharपालघर